पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
यशाच्या शिखरावरती असणारा कोणताही गुणवंत विद्यार्थी हा खर्या अर्थाने शाळेचा नावलौकीक असतो तर असे गुणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी शाळेतील शिक्षक तर विशेष परिश्रम घेतच असतात. परंतु विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये शिक्षकांबरोबरच पालकांचीही भुमिका महत्वपुर्ण ठरत असते. असे प्रतिपादन श्री शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक औदुंबर गायकवाड यांनी केले.
पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील श्री शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयामध्ये पुस्तक वाटप, नवागतांचे स्वागत व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान कार्यक्रमाप्रसंगी गायकवाड बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागनाथ माळी हे होते. तर यावेळी कार्यक्रमासाठी खरेदी विक्री संघाचे संचालक नारायण गायकवाड, रोपळे विकास प्रितष्ठानचे अर्जून भोसले, मधुकर गुंजाळ , सुरेश निंबाळकर, विनायक निंबाळकर, सिध्देश्वर भोसले, शंकर कदम यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रस्ताविक शिक्षक सोमनाथ जगताप यांनी केले तर माजी कृषी अधिकारी मधुकर गुंजाळ यांनी गुणवंत विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले. यावेळी नवागतांचे स्वागत, पुस्तक वाटप करून शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना मुख्याध्यापक गायकवाड यांनी पालक आणि ग्रमस्थांकडून शाळेसाठी होणार्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त करीत शाळेच्या गुणवत्तेसाठी मार्गदर्शक ठरणार्या शिक्षकांचे अभिनंदन केले. तर येत्या शैक्षणिक वर्षामध्ये अधिकाधिक शैक्षणिक उपक्रम राबवण्याची ग्वाही दिली. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक, ग्रमस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.