पुस्तक परीक्षण
आयुष्य जगताना या पुस्तकाचे नवोदित लेखक स्वप्निल हनुमंत जमदाडे या पंढरपूर तालुक्यातील केसकरवाडी गावातील असून आपल्या आयुष्यात आलेल्या वेगवेगळ्या अनुभवातून पुढील येणाऱ्या भावी पिढीला आलेल्या प्रसंगास कसे सामोरे जावे हे समजण्यासाठी हे पुस्तक लिहिले आहे.
आयुष्य जगताना या पुस्तकात सकारात्मक विचार आपण कसे केला पाहिजे त्याचबरोबर नकारात्मक विचारातून आपण कसे बाहेर पडाल आपण जर एखादा मित्र अडचण असेल दुःखी असेल नकारात्मक विचार करत असेल तर आपण त्याला काय सांगत असतो सगळं नीट होईल तो फक्त सकारात्मक विचार कर,
असं केल्याने काय होईल तर त्या व्यक्तीला त्या संघर्ष सोबत लढण्याची ताकद भेटेल व त पुन्हा एकदा जोमाने काम करून जिंकेल पण.
त्याचबरोबर आपण गुरु आपल्या आईला वडिलांना प्रथम गुरु म्हणतात तर दुसरे गुरु आपले शिक्षक जे आपल्याला ज्ञानदानाचे काम करत असतात आयुष्यात कसं राहायचं कसं वागायचं कसं बोलायचं हे सांगत असतात तर तिसरे आणि शेवटचे गुरु म्हणजे आपल्याला मार्गदर्शन करणारा व्यक्ती मग तो कोणीही असेल लहान असेल किंवा मोठा असेल किंवा आपल्या आदर्श व्यक्ती तो स्वतः आपण कसा ठरवला गेला पाहिजे ,
मन आणि विचार ह्याला फरक सांगताना मन अशी गोष्ट आहे ती सेकंदात कुठेही जाऊ शकते विचार हे आपले अनुभव ज्ञान असे विचार केल्यास आपण निर्णय घेण्यास भाग पाडतात,विचार प्रत्येकाचे वेगळे असू शकतात
आत्मविश्वास ही यशाची पहिली गुरुकिल्ली आहे स्वतःवरील आत्मविश्वास आपल्याला योग्य कृती योग्य वेळी करता आली तर जिवनांमध्ये आपल्याला कोणी हरवू शकत नाही
जिज्ञासा म्हणजे तरी काय जाणून घेण्याची वृत्ती आपण कोणती गोष्ट आपल्याला माहीत नसेल तर ती गोष्ट पण समजून घेतली पाहिजे व ती जाणून घेतली पाहिजे त्याचे विचार त्याच्या अनुभव जाणून घेतले पाहिजे असेच का घडले तसेच का घडले हे लहान मुले प्रश्न विचारत असते त्यावेळेस त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तरे समजून सांगणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे तेव्हा त्यांची जिज्ञासा वृत्ती वाढेल
वाचाल तर वाचाल हे सुवचन अगदी खरं आहे आपल्याला ज्ञान वाचनामुळे प्राप्त होतं आणि ज्ञानाच्या आधारावर कोणतीही गोष्ट आपण करू शकतो
आयुष्याचा SWOT विश्लेषण करायला जमलं की आपण आयुष्यात पुढे प्रगती करू शकतो
हे अगदी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे,
स्वप्नांचा पाठलाग कसा केला पाहिजे अपयशाची परिस्थिती कशी हाताळली पाहिजे व आपल्याला माहिती अपयश आले लोकांचा आत्मविश्वास कमी होतो त्यामुळे पुढच्या यशाला मुकावे लागते मग त्यातून कसं बाहेर पडलं पाहिजे व पुढील आयुष्यात संघर्ष कसा कराल पाहिजे, साधेपणामुळे आपण श्रेष्ठ बनत असतो जीवन जगत असताना आपण नुसतं प्रापंचिक विचार करून चालणार नाही त्या बरोबर आपल्याला परमार्थ हित त्यांनी राष्ट्रीय हित पण कसे साधता येईल,
जिंकणे किंवा हरणे या आयुष्यात दोन्ही घडत असतं
जिंकल्यानंतर हुरळून न जाता पुढची प्रगती कशी करता येईल याकडे आपण लक्ष दिले पाहिजे व हारल्यानंतर त्यातून बाहेर कसं पडायचं त्याच बरोबर योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन घेतलं पाहिजे आपला आई-वडिलांना संवाद साधला पाहिजे व त्या दृष्टीने आपण पुढे प्रवास केला पाहिजे तरच आपण जीवनात यशस्वी होईल
शेवटी कम बॅक करणं पण तेवढेच गरजेचे आहे व सर्व गोष्टी वेळेत झाल्या पाहिजे नोकरी लग्न व जबाबदारी वेळेतच आपण हातात घेतली पाहिजे
आयुष्याचा जगताना या पुस्तकातून विद्यार्थी पालक व वयोवृद्ध या व्यक्तींना प्रेरणादायी कसे ठरेल हा विचार करून हे पुस्तक लिहिलंय अगदी साधं व सोपं आहे नक्कीच तुम्हाला आवडेल
हे पुस्तक वाचल्यावर नक्कीच तुमच्या मध्ये सुधारणा होईल असं मला वाटतं.
पुस्तक परीक्षण प्रशांत माळवदे