पत्रकार बांधवांनो महाराष्ट्र वाचवा
तुम्ही हाडाचे पत्रकार असाल तर सांगा.. तुम्ही खुप चांगली पत्रकारिता करत होता...आहात..कराल... तुमच्या पत्रकारितेची लेखनी आता नाचू द्या.राजकारणाचा स्तर कोण कोणत्या छपरी व टपरी लोकांमुळे रसातळाला गेला.यावर व्हिडिओ बनवा.जुने व्हिडिओ एकमेकांवर चिखलफेक केलेले तरुण मतदारांना दाखवा.आम्हाला राजकारणाचा अ कळत नाही. राजकारणाचे डावपेच कळत नाहीत.ठराविक कुटुंबे वेगवेगळ्या पक्षात राहून राजसत्ता उपभोगत आहेत. रान पेटवून दूर स्वतः ला हाय लागू नये अशा ठिकाणी बसून सून मेली काय सासू मेली आपल्याला मलिदा मिळाला म्हणजे बास झाले..अशा पध्दतीने टपोरी राजकारण केले जात आहे.तुम्ही आता लोकांना संविधान काय सांगते ते संपूर्ण संविधान साध्या सोप्या सरळ भाषेत लोकांपर्यंत अनेक भागात घेऊन समजून सांगा...करा मालिका सुरू आता... महाराष्ट्रातील सध्याचे पत्रकार बांधव आगित तेल टाकून....झदम लोकांची पोळी भाजण्यासाठी पत्रकारिता करित आहेत.परंतु तुम्ही हाडाचे पत्रकार वाटता.लोकांचे हक्क काय... कायदा काय सांगतो...१६६ पेक्षा जास्त आमदार व ३० पेक्षा जास्त मराठा खासदार यांची भूमिका काय... म्हणून प्रत्येक आमदार व खासदार यांना कायदेशीर प्रश्न विचारून तसेच समोर OBC आमदार व खासदार बोलवून Live कार्यक्रम घेऊन प्रश्न - उत्तरे कार्यक्रम घेऊन प्रश्न तडीस न्या...छपरी व टपरी लोकांमुळे लोकांचे जीव चाललेत. १ मे १९६० नंतर महाराष्ट्रातील पोलीस स्टेशन मधील कोणी कोणावर अन्याय केला याचा केस स्टडी करून...त्याचे Analysis सोप्या भाषेत सामान्य नागरिकांना समजेल अशा भाषेत सांगा... तसेच महाराष्ट्रात आतापर्यंत अनेक जातीय दंगलसदृश परिस्थिती निर्माण होऊन ती पुन्हा निवळली..परंतू त्याचा प्रमूख सुत्रधार कोण होता..हे अजून ही महाराष्ट्राला कळले नाही.येथे पत्रकार व पत्रकारिता कमी पडली का..? पत्रकारकांनी गोंडा चोळला का..? किंवा प्रशासकीय व्यवस्थेना गोंडा घोळला का ? कि संविधानाला हरविले हे पण सांगून टाका. आजारी पत्रकारितेवर मात करून पूनश्च पत्रकारितेचा श्रीगणेशा करा .. तुमच्या बाहाद्दूरीला शुभेच्छा.
आनंद आलदर