धनदांडग्याना मुभा : गरीब व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा
मायणी प्रतिनिधी विशाल चव्हाण तेज न्यूज
येथील अतिक्रमण कारवाई प्रकरणी निष्पक्ष कारवाईचे प्रशासनाकडून व्यापारीवर्गास देण्यात आलेले आश्वासनाची प्रत्यक्षात पूर्तता करण्यात आली नाही. याउलट चांदणी चौकात उद्योग करणाऱ्या काही छोटेखानी व्यापाऱ्यांवर फक्त ग्रामपंचायतीकडून कारवाई करण्यात आली. गावातील धनदांडग्या व्यापाऱ्यांना ग्रामपंचायती कडून अतिक्रमण प्रकरणी मुभा देण्यात येऊन त्याच्यावर अद्याप कारवाई करण्याचे टाळण्यात आलेले आहे. याउलट गरीब व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. सदर घटनेत निष्पक्ष कारवाई न झाल्याने प्रशासनास सहकार्य करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
मायणी ग्रामपंचायतीत चांदणी चौक व मुख्यपेठेतील रस्ता आणि गटर वरील अतिक्रमण काढण्यासाठी सोमवार दि. १० तारखेला झालेल्या स्थानिक व्यापारी व पोलीस व स्थानिक प्रशासन यांच्यात बैठक संपन्न झाली. यावेळी मायणी गावातील सर्व रस्त्यावरील अतिक्रमणे कोणताही भेदभाव न करता काढण्यात येतील . यास कोणी व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला तर यावर पोलीस प्रशासन कठोर कारवाई करेल, असे ठामपणे मायणी पोलीस दुरक्षेत्रचे पीएसआय प्रमोद वाघ यांनी सांगितले होते.
सदर बैठक मायणी ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिनिधी रणजित माने यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी ग्रामसेवक एस.कोळी, पोलीस पाटील प्रशांत कोळी, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
यानंतर प्रत्यक्ष कारवाई करताना मायणी ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी रणजित माने व पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत बुधवार दुपार पर्यंत विटा रस्त्यावरील भाजीपाला व्यापारी व काही दुकानदार यांनी आपली अतिक्रमणे स्वतः काढून घेतली. परंतु चांदणी चौक व मुख्य बाजारपेठेतील शेकडो दुकानदारांनी रस्ता व गटर पथरस्त्यावर आपली अतिक्रमणे थाटली आहेत .यावर प्रतिबंध करण्यात आलाच नाही .
निष्पक्ष कारवाईचा बार फुसकाच
व्यापारी व प्रशासन यांच्यातील बैठकीत अतिक्रमण कारवाई निष्पक्ष होणार असल्याची प्रशासनाचे आश्वासन फोल ठरले आहे. मायणी गावातील धनधांडग्या व्यापाऱ्यांचे अतिक्रमणास कोणताही धक्का न लावता, हातावर पोट असनाऱ्या गरीब व्यापाऱ्यांवर ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला . प्रशासनाकडून सदर प्रकरणी निष्पक्ष कारवाई झाली नसल्याने व्यापारी वर्गात असंतोष पसरला आहे.
"ग्रामपंचयत व पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून आम्ही आपले फळांचे दुकाने व सोबतची दुकाने त्याप्रमाणे लावण्यात आली होती. परंतु बैठकीत पर्यायी व्यवस्थेबाबत देण्यात आलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी न करता कारवाईत दूजाभाव करत फक्त आमच्या दुकानांवर प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करूनही कारवाई करण्यात आली. अद्याप गावातील अनेक ठिकाणची अतिक्रमण हटवण्यात आलेली नाहीत.
- फळविक्रेता, रेहान बागवान. मायणी