(नारायण चिंचोली ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम)
( पर्यावरण रक्षणाची घेतली प्रतिज्ञा )
तुंगत प्रतिनिधी तेज न्यूज
१ जुन शासकीय वाढदिवस दिन म्हणुन ओळखला जातो या दिवशी अनेकांना वेगळ्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जातात. अशाच प्रकारे पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली ग्रामपंचायतीने वेगळी संकल्पना राबवुन एक आदर्श उदाहरण ठेवले असुन ग्रामपंचायत मार्गदर्शक आणि पांडुरंग सह.साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण धनवडे यांनी पुढाकार घेत गावामध्ये जितक्या लोकांची १ जुन जन्म तारीख आहे त्यांचा एकत्रित सन्मान करून वृक्ष लागवड त्पांचे संगोपन करण्याबबत जनजागृती केली.
अशाप्रकारे शुभेच्छा देऊन पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली ग्रामपंचायत ने अनोख्या पद्धतीने एक जून रोजी वाढदिवस असणाऱ्या नागरिकांचा सन्मान करून पर्यावरण पूरक वाढदिवस साजरा केला. सध्याच्या तापमान वाढ, पाणीटंचाई ,पर्यावरणातील बदल ,पावसाची अनिश्चितता ,या सर्वावर उपाय म्हणजे वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करणे. हे गावातील नागरिकांना पटवून देण्यासाठी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री लक्ष्मण तात्या धनवडे यांनी अनोखा उपक्रम राबवला.
अशिक्षित आई-वडिलांमुळे ज्यांना आपली वाढदिवसाची तारीख माहीत नाही. त्या सर्वांचा वाढदिवस गुरुजींच्या कृपेने एक जून हाच असतो. मग हा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यासाठी भला मोठा केक आणला.वाढदिवस असणाऱ्या व त्यांना शुभेच्छा देणाऱ्या नागरिकांना एकत्र जमवले. यावेळी व्यसनमुक्ती आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्ष संवर्धन करणेबाबत मार्गदर्शन केले.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे
या तुकोबांच्या अभंगाचे विवेचन केले. ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना पुष्पहार व ऑक्सिजन वाढवणारे एक रोप देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मी व्यसन करणार नाही व व्यसन करणाऱ्या इतर पाच लोकांना व्यसनापासून मुक्त करेन. यावर्षी मी पाच झाडे लावून त्याचे संगोपन करीन व इतर पाच लोकांना वृक्ष संवर्धनाबाबत जनजागृती करेन. गाव परिसर ,घर ,अंगण, स्वच्छ ठेवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील. अशी प्रतिज्ञा उपस्थितांनी घेतली. याचवेळी तंबाखू सिगारेट बिडी मावा गुटखा एकत्र टाकून त्याची होळी केली. या पर्यावरण रक्षणाच्या कार्यक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.
अशा आगळ्यावेगळ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री लक्ष्मण तात्या धनवडे हे होते. यावेळी गावचे उपसरपंच गहिनीनाथ तात्या चव्हाण, सरपंच सौ.नर्मदा ताई धनवडे, ग्रामसेवक श्री.संतोष गायकवाड मा. सरपंच श्री विठ्ठल माने श्री नितीन मस्के श्री बळवंत धनवडे , श्री.अविनाश चव्हाण यांचेसह , सौदागर गुंड, ज्ञानेश्वर बरडे,शिवाजी भोसले , विष्णू माने,शिवाजी वसेकर, ,ज्ञानेश्वर मस्के, पोपट पाटील, सुनील माने, प्रवीण खरात, गणेश लामकाने , धनाजी पांढरे प्रशांत कोळेकर, श्रीधर कोळेकर ,समाधान बचुटे ,तुकाराम आहेर, बाळू बनसोडे, विजय पाटील ,आप्पासाहेब खांडेकर ,तानाजी वसेकर, गणेश कोळेकर, निवृत्ती मस्के ,रमेश पवार ,बाळासाहेब नलवडे ,दत्तात्रय माने, नवनाथ नलवडे, नारायण गुंड ,नितीन घाडगे, सज्जन हाडमोडे,पप्पू वाघमोडे, मुकुंद घाडगे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे निवेदन प्राध्यापक दत्तात्रय मस्के सर यांनी केले. तर आभार बापू कोले यांनी मानले.