सावधान...रिव्हेंज पाॅर्नच्या घटना वाढू लागल्यात..!
मनुष्य हा जगातील एकमेव प्राणी असेल की त्याला हवे ते नाही मिळाले तर तो नेहमी बदल्याच्या भावनेत वावरत राहतो.अशा बदल्याच्या भावनेतून रिव्हेंज पाॅर्नच्या घटना वाढू लागल्या आहेत.याला कारण आहे बदललेली लाईफस्टाईल. प्रत्येक ठिकाणी मोबाईलचा होणारा अतिरिक्त वापर... त्यामुळे अशा घटना वाढू लागल्या आहेत.याचा विचार समाजातील सर्व स्तरातील लोकांनी करणे गरजेचे आहे.आज बदला भुमिकेमुळे अविवाहित व विवाहित स्त्रिया व पुरुष या दोघांनीही भावनेच्या आहारी न जाता विचार करणे गरजेचे आहे.
पूर्वी प्रेम भंग झाला तर ऍसिड व प्राणघातक हल्ले होत असतं.परंतू आता आधुनिक तंत्रज्ञानाचे शस्त्र आले आहे.त्याचा वापर विकृत बुद्धीचे कधी करतील हे सांगता येत नाही.त्यामुळे सावधान राहणे गरजेचे आहे.बदनामी, पोलिस स्टेशनच्या चकरा यामुळे जीव पुरता घायाळ होऊ शकतो. यदाकदाचित बदनामी मुळे अनेक अविवाहित व विवाहित टोकाची भूमिका घेऊन जीवनाचा अंत करत असलेल्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.... त्यामुळे सावधान राहणे हाच यावरील एकमेव उपाय आहे.
सध्या रिव्हेंज पाॅर्न कमी कालावधीत श्रीमंत होण्याचे माध्यम बनत चालले आहेत. पहिल्यांदा प्रेमाच्या नावाखाली गोडगोड बोलून त्या व्यक्तीला आपलेसे केले जाते.तो किंवा ती व्यक्ती आपले सर्वस्व अर्पण करू लागते...न कळत भावनेच्या आहारी जाऊन नग्न फोटो व व्हिडिओ केले जातात. तिथेच आयुष्याचा पाय घसरला जातो. तो किंवा ती व्यक्ती एकांतातील काढलेले फोटो व व्हिडिओ यांचा वापर करून ब्लॅक मेलिंग करायला सुरुवात करते. नको त्या गोष्टीची मागणी वाढते.बदनामीच्या भितीने ती व्यक्ती ठराविक दिवस अन्याय सहन करते.तो पर्यत ती व्यक्ती मानसिक व आर्थिक दृष्ट्या खंगूण जाते. एक दिवस तो किंवा ती व्यक्ती जीवनाचा अंत करते.
म्हणून म्हणतो मित्रानो व मैत्रिणींनो अशा घटना आपल्या आजूबाजूला घडत आहेत.परंतू बदनामीच्या भितीने अशा घटना का घडल्या हे उजेडात येत नाहीत.
एखादी गोष्ट नाहीच मिळाली ( पैसा व शरीर ) तर पूढील व्यक्तीची विकृत बुद्धी जागृत होते.तेथेच आपल्या आयुष्यातील भयानक वादळाला सुरुवात होते.या वादळात आपले भान हरपून जाते. तो किंवा ती व्यक्ती एकांतातील काढलेले फोटो व व्हिडिओ इंटरनेटवर व सोशल नेटवर्किंग साइटवर टाकण्याच्या धमक्या देऊ लागते.. कदाचित ती अशा साइटवर फोटो व व्हिडिओ टाकायला घाबरत नाहीत.कारण त्यांची विकृत बुद्धी जागृत झालेली असते.
अशा घटनांनी सध्या जगभरात धुमाकूळ घातला आहे.तरी सर्व वयोगटातील नर व नारींना विनंती आहे की भावनेच्या आहारी जाऊन एकांतातील गोष्टी रेकाॅर्ड केल्या जात असतील तर भविष्यकाळात बदल्यांच्या भावनेचे तुम्ही बळी ठरला म्हणून समजा...मग त्या घटना तुमच्या नासमज वयात घडल्या असतील तर त्यांचा वापर विकृत बुद्धीचे तुमच्या चांगल्या चाललेल्या संसारात माती कालविण्याने कामही करू शकतात.
त्यामुळे सावधान...असे काही घडले आहे असे वाटत असेल तर त्याचे प्रुप गोळा करून तुम्ही पोलिसांची मदत घेऊ शकता.... परंतु ते प्रकरण इतके मोठे होण्यापेक्षा आपल्या भावनेला आवर घालणे तंत्रज्ञानाच्या युगात कुठे तरी फायद्याचे ठरेल... एक तर आपली व आपल्या कुटुंबाची बदनामी करून आपली आर्थिक लूट व मानसिक बदनामी होऊ शकते..... त्यामुळे सावधान आपण रेव्हेंज पॉर्नचे बळी तरी ठरत नाही ना....याची काळजी अविवाहित व विवाहित नर व नारींनी घेणे हीच काळाची आवश्यकता आहे.
लेखन आनंद आलदर