कोल्हापूर प्रतिनिधी तेज न्यूज
शिवसेना मुख्य नेते, राज्याचे मुख्यमंत्री,मा.एकनाथरावजी शिंदे यांनी मेहतर, रूखी, वाल्मिकी समाज मुख्य प्रवाहात यावा व त्यांना न्याय हक्कांचे प्रश्न मांडता यावेत याकरिता -शिवसेना प्रणित - मेहतर, रूखी, वाल्मिकी (स्वतंत्र) विभागाची स्थापना केली आहे.
मुख्यमंत्री यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात मेहतर समाजावर सरकार बिलकुल अन्याय करणार नाही तसेच या समाजातील सुशिक्षित मुलांना शैक्षणिक पात्रतेनुसार वारसा हक्काने नोकरी देण्यात येईल अशी केली घोषणा आहे.
एकनाथराव शिंदे यांची मेहतर, रूखी, वाल्मिकी समाजाबद्दलची आस्था व सकारात्मक दृष्टिकोन यामुळे हा समाज राज्य समन्वयक मुकेश सारवान आणि राज्य उपाध्यक्ष सुरेश तामोत यांच्या नेतृत्वांत मेहतर, रूखी, वाल्मिकी (स्वतंत्र) विभागात मोठ्या संख्येने संघटीत व सहभागी होत आहे.
मेहतर, रूखी, वाल्मिकी समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता -
१) स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापन करावे.
२) स्वतंत्र कल्याण बोर्ड स्थापन करावे.
३) अनुसूचित जाती प्रवर्गातील १३ टक्के आरक्षण मधून विशेष आरक्षण मिळावे.
४) मालकी हक्काने घरे मिळावीत.
५) राज्याच्या गृहनिर्माण आवास योजनेत या समाजाचा समावेश व्हावा.
ह्या संघटनेच्या प्रमुख मागण्या राज्य शासनाकडे असून मुख्यमंत्री, एकनाथराव शिंदे त्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन या समाजाला न्याय देतील असा या समाजाला पूर्ण विश्वास आहे.
त्यामुळे शिवसेनेला राज्यातील मेहतर, रूखी, वाल्मिकी समाजाचे मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे.
केंद्र सरकारनेही या समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता -
१) स्वतंत्र विशेष आरक्षण देण्यात यावे.
२) सफाई कामगारांना सफाई सैनिक हा दर्जा देऊन विशेष पेन्शन योजना सुरू करावी.
३) स्वतंत्र कल्याण बोर्ड स्थापन करावे.
४) महाराष्ट्र शासनाच्या धर्तीवर संपूर्ण देशात लाड समिती वारसा हक्क नियुक्ती धोरण निश्चित करावे.
५) जातीचा दाखला व जात पडताळणी दाखला देण्याची अट शिथिल करावी.
अशा प्रमुख मागण्या असून याकरिता देशाच्या उच्चतम लोकसभेत या संदर्भात आवाज उठवणे महत्त्वाचे व आवश्यक आहे.
त्याकरिता शिवसेनेचे लोकसभा कोल्हापूर व हातकणंगले मतदार संघाचे उमेदवार खा.संजय मंडलिक व खा. धैर्यशील माने व महायुतीला प्रचंड मताधिक्य देऊन विजयी करावे असे आवाहन मुकेश सारवान आणि सुरेश तामोत यांनी कोल्हापूर, जयसिंगपूर, गडहिंग्लज येथे संपर्क सभा घेऊन त्यांच्या नेतृत्वांतील मेहतर, रूखी, वाल्मिकी (स्वतंत्र) विभाग,महाराष्ट्र राज्य, उपेक्षित दलित सामाजिक परिषद (भारत),शिवराज्य सफाई कर्मचारी सेना या संघटनांचे जिल्हाध्यक्ष,शहराध्यक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जिल्ह्यातील सर्व समाज बांधव - भगिनीं यांना केले आहे.