सद्गुरू भजलिंग महाराज उटी पूजा प्रित्यर्थ प्रवचन मालेस उत्स्फूर्त प्रतिसाद
करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या श्री सद्गुरू भजलिंग महाराज यांच्या चंदनउटी पूजा प्रित्यर्थ प्रवचन मालेत पहिल्या दिवशीच्या सत्रात श्रीगुरु जयवंत महाराज बोधले सांगत होते.सुरुवातीला डॉ जयवंत महाराज बोधले, श्रीनाथ महाराज शिरवळकर,अध्यक्ष बाळासाहेब वास्ते,संजय दुधाणे,सुदाम महाराज पिसे, प्रभाकर टेके श्रीकांत महाराज आरोळे,भारत वास्ते,भारत लोहार यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून प्रवचनमालेस सुरुवात झाली.आम्हीं वैकुंठवासी आलो याचि कारणासी या संत तुकाराम महाराज चरित्र चिंतन या विषयावर बोलत असताना देहू म्हटलं की संत तुकाराम महाराज,आळंदी म्हटलं की संत ज्ञानेश्वर महाराज पंढरपूर म्हटलं की विठूराया म्हणजे या सर्व संतांनी सर्व लोकांना अध्यात्माची आवड लोकांमध्ये निर्माण करून कायम लोकांच्या ह्रदयात स्थान मिळवले.खर पाहता सामान्य माणूस हा ठराविक काळापूरताच लक्षात राहतो.त्यामुळे संतांनी केलेलं कार्य खुप मोठं असून त्याची कास सर्वांनी धरली पाहिजे.संतानी आयुष्यभर लोकांवर उपकारच केले.कोणाची निंदा केली नाही,संतांनी प्रपंचाबरोबर परमार्थ ही केला आणि तो यशस्वी केला.त्यानंतर तुकाराम महारांची वंशपरंपरा आणि गुरू परंपरा याविषयी सखोल माहिती सांगून मागील आठ पिढ्यांची विठ्ठलावर असणारी अपारश्रध्दा यामुळे संत तुकाराम महाराज जगद्गुरू बनून सामान्य माणसाचा उध्दार करुन आयुष्य सार्थकी बनवले.या विषयावर अनेक दृष्टांत देत जगद्गुरुच का तुकाराम महाराजांना म्हटलं ते सांगून भक्तभाविकांना आपल्या अमृतवाणीने मंत्रमुग्ध केले.
प्रास्ताविक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केले.तर पुढील दोन दिवस चालणाऱ्या या प्रवचन मालेचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री सद्गुरू भजलिंग महाराज मठाच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रवचन मालेस करकंब गावच्या आणि पंचक्रोशीतील भक्तभाविक यांनी भरभरून प्रतिसाद दिला