शिवशंभू संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने किल्ले तोरणा येथे हिंदवी स्वराज्याचे तोरण उत्सव ऐतिहासिक विजय दिवस उत्साहात साजरा
प्रत्येकाला आपलंस करणारे राजे शिव छञपती शिवाजी महाराज:-मा.आमदार रामहरी रुपनवर
महाराष्ट्र राज्यातील गडकोट किल्ले त्यांचे संवर्धन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यासाठी शिवशंभू संघटनेची स्थापना करण्यात आली.यातूनच किल्ले तोरणागडावर तोरणा विजय दिवस महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना व स्वयंसेवी संस्थांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
सुरुवातीला तरुणांनी किल्ले तोरणावर जाऊन मुख्य दरवाजाला नारळाचे तोरण बांधून शिवरायांची पालखी गडांवर नेऊन विधिवत पूजा केली त्यानंतर मा..आमदार रामहरी रुपनवर , श्री.तुकाराम महाराज यांचे वंशज शिरीष महाराज मोरे, शिवशंभू चे संस्थापक महादेव पवार राजमुद्रा प्रतिष्ठान चे सिताराम धुमाळ आदी मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.
त्यानंतर पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये करकंब येथील लेकीचं झाड आणि जागर टीमच्या माध्यमातून काम करणाऱ्या ज्ञानेश्वर दुधाणे यांना पर्यावरण प्रेमी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
त्यानंतर राजमुद्रा प्रतिष्ठान जाधववाडी,सुनीशा शहा, (सातारा)अतुल नाना माने(शंभू गौरव)शिव संदीप वाघ(नाशिक)जयराम शेळके (कृषिरत्न) संभाजी पाटील (समाजसेवक) शिवशासन गृप (आदर्श संस्था)दर्लिंग क्रिडा मंडळ आदींना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
यावेळी शिरीश महाराज मोरे,रामहरी रुपनवर यांनी मनोगत व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या हिंदवी स्वराज्याचा इतिहास अतिशय. मोठा असून तरुण पिढीने राजांच्या कार्याचा वारसा जतन करत राजांचे विचार अमलात आणून जीवन कृतार्थ करावे.वर्षातून एकदोन वेळा तरी गड किल्ले पाहायला यावे म्हणजे शिवरायांच्या महान कार्यांची जाणीव तरुणांना झाल्याशिवाय राहणार नाही.असे सांगून ज्ञानेश्वर दुधाणे यांनी तरुणांनी ऐतिहासिक शस्त्रविद्या आत्मसात करावी, मैदानावरील खेळांना प्राधान्य देऊन शरीर संपदा कमवावी आणि सध्याच्या काळात शरीर संपदा हिच खरी श्रीमंती असणार आहे असे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष महादेव पवार यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रशांत परब यांनी केले तर गोरख भागाये यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिवशंभू संघटनेचे तानाजी नागणे,राहुल रोकडे,संजय पवार,शरद ताड,सागर पवार, रविकांत घुले,सुदर्शन तरटे, प्रदीप शिंदे, गणेश कदम,रुपेश नलवडे,मयुर तुपे,या तरुण जवानांनी अधिक परिश्रम घेतले.