शेळवे प्रतिनिधी
"क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले " बाल संगोपन योजना महाराष्ट्र शासनाकडून राबविली जात आहे.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेची ठळक वैशिष्टे अनाथ निराधार एकल पालक घटस्पोटित महिलांची बालके गंभीर आजारामुळे पालक दवाखान्यात असणे कौटुंबिक न्यायालयीन वादातील कुटुंबातील बालके इ . बालके वय वर्ष ० ते १८ यांना शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून दरमहा रु २२५० / इतके परिरक्षण अनुदान १ऑगस्ट २०२३ पासून देण्यात येणार आहे .
ही योजनेचा लाभ शेळवे गावात मिळवून देण्यासाठी संजय गाजरे यांनी ठरवले आणि त्यांनी संबंधित असलेल्या सर्व पालकांच्या भेटी घेऊन त्याच्याकडून सर्व कागदपत्रे मिळवून त्याचे प्रस्ताव तयार करून समाज कल्याण विभाग सोलापूर यांचेकडे जमा करून त्याचा वेळोवेळी पाठपुरावा ही केला त्यामुळे आज शेळवे गावातील 13 विद्यार्थी या योजनेस पात्र झाले आहेत त्यांच्या या कार्याबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदन केले जात आहे.
लाभार्थी पुढीलप्रमाणे १) पार्थ जगदीश वाघुले २) प्रांजल जगदीश वाघुले ३) अरुण दत्तात्रय गाजरे ४)आदिती दत्तात्रय गाजरे ५) माऊली समाधान गाजरे ६)ज्ञानेश्वरी समाधान गाजरे ७) श्लोक समाधान मस्के ८)सिद्धार्थ समाधान मस्के ९) गुरुप्रसाद नवनाथ नागटिळक १०)समीक्षा नवनाथ नागटिळक ११) ज्ञानेश्वरी समाधान गंगाधरे १२)सुरज समाधान गंगाधरे १३)पृथ्वीराज युवराज चव्हाण शासनाच्या अनेक योजना असतात परंतु त्या लाभार्थीपर्यंत पोहोचत नाहीत.
परंतु संजय गाजरे यांनी या योजनेचा लाभ १३ लाभार्थ्यांना मिळवून दिला त्याबद्दल त्यांचे सर्व ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे.