राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या अर्थसहायात भरीव वाढ,आता मिळणार महिन्याला 20 हजार रुपये
वयोवृद्ध पत्रकारांची हेळसांड थांबविण्यासाठी निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई प्रतिनिधी
राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान निधीत अकरा हजारावरून 20 हजार रुपये अशी भरीव वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भात अनेक पत्रकार आणि पत्रकार संघटनांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला. वयोवृद्ध पत्रकारांची हेळसांड थांबविण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
यासंदर्भात गेल्या वर्षीच्या अधिवेशनात विधानपरिषदेत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी देखील यासंदर्भात चर्चा उपस्थित केली होती त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात अर्थसहाय वाढविण्याची घोषणा केली होती.
ज्येष्ठ पत्रकारांप्रती आदरभाव, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि वृध्दावस्थेत त्यांची हेळसांड होऊ नये म्हणून "आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेत अधिस्वीकृतीधारक पात्र ज्येष्ठ पत्रकारांना सध्या ११ हजार रुपये सन्मान निधी दर महिन्याला मिळतो. आता 9 हजार रुपयांनी ही रक्कम वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने राज्यातील वयोवृद्ध पत्रकारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ही योजना राबविण्यात येत असून निकष व कार्यपध्दतीनुसार प्रत्यक्ष पात्र अधिस्वीकृतीधारक ज्येष्ठ पत्रकारांनाच या योजनेचा लाभ देण्यात येईल. ही मासिक अर्थसहाय्याची रक्कम "शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी" मधील ५० कोटी इतक्या मुदत ठेवीच्या रकमेवरील व्याजाच्या रकमेतूनच देण्यात येईल. ही रक्कम डीबीटीने संबंधित पत्रकारांच्या खात्यात जमा होईल. गेल्या वर्षी मार्चमध्येच हा निधी ३५ कोटींवरून वाढवून ५० कोटी करण्यात आला आहे.
राज्यात अनेक वयोवृद्ध पत्रकार हलाखीच्या परिस्थितीत जगत आहेत. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी देखील आर्थिक मदत नसते. या वाढीव निधीमुळे त्यांना चांगले अर्थसहाय मिळेल.
जेष्ठ पत्रकारांची थोतांड योजना, "यात व्यापकता कुठं ?" - विनोद पत्रे
समाजाला मदत करणारा कोण हा कांबळे ?
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी २ दिवसापूर्वी राज्यातील जेष्ठ पत्रकारांना दरमहा ११००० , रूपये पेन्शन वरून थेट २०००० रूपये प्रति दरमहा देण्याचा शासकीय GR दि. १४/०३/२०२४ रोजी काढण्यात आला आहे. अहो साहेब खरंच प्रमाणित व जेष्ठ पत्रकारांना या शासकीय पेन्शन योजनेचा लाभ मिळतो का ?
तर आपल्या माहिती विभागातीलचं काही आजी - माजी अधिकारी यांनी पैशासाठी, जातीसाठी अनेक कोरे कागद हे चक्क काळे केले असून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला जात नसावी, पत्रकार हा समाजाचा व लोकशाहीचा आरसा असून प्रत्येक बातमी लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी धरपड करीत असतो मग यात जात, धर्माचे काय ?
यात कांबळे नावाच्या पत्रकाराने, अधिकार्याने मागील दोन ते तीन वर्षोंत फक्त आपल्यांचे भले केले मगं ईतरांचे काय होणार, एकीकडे माहिती व जनसंपर्क विभाग मुंबई कुंभकर्णी झोपेत असतांना त्यांना ग्रामीण व जेष्ठ पत्रकाराचे काहीही देने - घेने नाही परंतु आपण राज्याचे मुख्यमंत्री व माहिती खात्याचे कर्ता व करविता असतांना देखील ग्रामीण व जेष्ठ पत्रकारांनवर अन्याय होत आहे, आम्ही "पत्रकार संरक्षण समिती" च्या सर्व शिष्ठ मंडळांनी महामहिम राज्यपाल महोद्यांची २०१९ मध्ये भेट घेऊन ग्रामीण व जेष्ठ पत्रकारांची लेखा - जोखा हाल सांगितला होता व त्या वेळी माहिती व जनसंपर्क विभाग मुंबई व आरोग्य विभाग यांना लेखी पत्र दिले आहे मग त्या सर्व पाठविलेल्या पत्राचे झाले काय ?
तुम्हाला फक्त भ्रष्टाचार करणारे अधिकारी व पत्रकार पाहिजे का ?
मगं अधिस्वीकृती धारकांना ,त्यात जे बोगस असतील त्यांना ही असेल तुम्ही आम्ही बसा मिरवत,म्हणे पत्रकार
सरकारला कष्टकरी नकोच आहे हा प्रश्न आता राज्यातील सर्व पत्रकारांन पुढे उपस्थित झालेला आहे.
विनोद पत्रे
संस्थापक / अध्यक्ष - पत्रकार संरक्षण समिती