वाडी कुरोली प्रतिनिधी
वाडीकुरोली या परिसरातील सर्व शेतकऱ्यांसाठी शेतीपुरक फायदेशीर माती परीक्षण करणे ही काळाची गरज अकलूज येथील रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्यां ग्रामीण भागामध्ये जागरुकता कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत वाडीकुरोली परिसरातील शेतकन्यांना मार्गदर्शन केले.
माती परीक्षणासाठी नमुना शाखीय पद्धतीने कसा घ्यावा ते करत असताना कोणती काळजी घ्यावी याचे प्रात्यक्षिक त्यावेळी घेतले. वर्षानुवर्ष पीक लागवडीमुळे मातीची सुपिकता कमी होत आहे. यासाठी मातीत कोणती मूलद्रव्ये कमी आहेत कोणते घटक घातक आहेत. याची माहिती माती परीक्षणाद्वारे मिळते. त्यानुसार आपण मातीमध्ये योग्य ती मूलद्रव्य खते मिसळू शकतो.
या सर्व उपक्रमासाठी प्राचार्य आर. जी. नलावडे,कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. एम. एकतपुरे, प्रा. एस. आर. आडत (मृदा शास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभाग) यांनी मार्गदर्शन केले, माती परीक्षणचे महत्व कृषिकन्या तृप्ती आदमिले,प्रिती हांडे, गौरी कदम, श्रद्धा गायकवाड,, अपेक्षा जाधव, निकिता ढगे, प्रियंका जायभाय, सेजल महाजन, प्राची जाधव यांनी वाडीकुरोली परिसरातील शेतकऱ्यांना पटवून दिले. या उपक्रमाला शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.