आई,वडील व गुरुचा आशीर्वादानेच जीवन आनंदायी :—कलशेट्टी
अरळी प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील श्री बृहन्मठ होटगी संचलित श्री स्वामी समर्थ प्रशालेत दहावी विद्यार्थ्याना निरोप देण्यात आला.
प्रथम महास्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन प्रमुख पाहुणे श्री मल्लिकार्जुन प्रशाला, बोरेगावचे मुख्याध्यापक श्री एस.के.स्वामी सर व श्रीक्षेत्र धोत्री येथील भगवती गौरीमाता प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील इतिहास अभ्यासक व व्याख्याते प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी सर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
तदनंतर प्रमुख पाहुण्याचे स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक श्री लक्ष्मण तेलुणगी सरांनी केले.यानंतर दहावी वर्गातील शेखर गामाजी,संतोष कुंभार,आरती तेली,प्रतिक्षा गोरड,प्राची गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करताना शिक्षकाप्रति व शाळेविषयी कृतज्ञता व ऋण व्यक्त केला.
यावेळी विद्यार्थ्याना शुभेच्छा देताना एस.के.स्वामी सर म्हणाले की प्रयत्न केल्यास हमखास यश मिळतेच.विद्यार्थी जीवनात जिद्द,चिकाटी व परीश्रम हीच यशाची गुरुकिल्ली आहे.परीक्षेत वेळेचे नियोजन व योग्य मार्गाचा अवलंब करुन चांगले गुण प्राप्त करा असेही म्हणाले. त्याचवेळी प्रा.कलशेट्टी सर म्हणाले की, आपण जर अभ्यास केला असाल तर यश आपलंच आहे तो आपल्यालाच मिळणार .अभ्यास करताना मनाची एकाग्रता असावी.जिद्द जिवंत ठेवा, जिज्ञासा जागी ठेवा, जॉय फुल जीवन जगता येते. पुढे असेही म्हणाले, जीवनाच्या परीक्षेत आई,वडील व गुरुंचा आशीर्वाद महत्वाचा आहे.आईवडीलांची व गुरुची सेवा केल्यास सर्व संकटे दुर होऊन जीवन आनंददायी होते.
कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन कणिसा पठाण ,कु.कलसुरे हिने तर आभार कु.सुहाना गामाजी मानले.हा कार्यक्रम नववी वर्गाच्या वतीने आयोजित करण्यात आला.दहावी वर्गाच्या सर्व विद्यार्थ्यांना खाऊ देवुन निरोप देण्यात आला.यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षकशिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.