पंढरपूर प्रतिनिधी
राज्यात वकिलांवर हल्ले होऊ लागले आहेत. यामुळे वकिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. म्हणून शासनाने वकील सुरक्षा कायदा लागू करावा, अशी मागणी पंढरपुरातील वकील संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
सोमवारी पंढरपुरातील वकिलांनी तहसील कार्यालयात येऊन राहुरी येथे आढाव वकील दांपत्याचे अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला. या प्रकरणाचा निषेध केला. तसेच पंढरपुरातील वकील विलास शेळके यांना एका विरोधी पक्षकाराने न्यायालयात शिवीगाळ केली आहे. यामुळे शासनाने वकील सुरक्षा कायदा लागू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावाबतचे निवेदन वकील संघटनेचे अध्यक्ष अर्जुन पाटील यांनी तहसीलदारांना दिले.
वकील सुरक्षा कायदा लागू करण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येत आहे. मात्र याकडे शासन दुर्लक्ष करत आहे. यामुळे राज्यात वारंवार वकिलावर हल्ले होत आहेत. यामुळे वकिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. म्हणून वकील सुरक्षा कायदा तातडीने लागू करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. यावेळी पंढरपुरातील अनेक वकील उपस्थित होते.