वाडी कूरोली प्रतिनिधी
ऊस उत्पादन आणि उत्पादकतेमध्ये घट आणणाऱ्या रोग किडींचे नियंत्रण करण्यासाठी बेणे प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत बाविस्टीन ची प्रक्रिया केल्यास रासायनिक खताची बचत केली जाते. उसामध्ये शुद्ध, निरोगी आणि चांगल्या बेण्याचा वापर केल्यास ऊस उत्पादनामध्ये 10 ते 15 टक्के वाढ झाल्याचे सिद्ध झाले आहे. ऊस उत्पादनामध्ये घट येण्याची जी प्रमुख कारणे आहेत.
त्यामध्ये शुद्ध, निरोगी आणि चांगल्या बेण्याचा अभाव हे प्रमुख कारण आहे. बहुतेक शेतकरी वर्षानुवर्षे जुने, निस्तेज झालेले, अशुद्ध रोगट, किडके, खोडवा पिकातील ऊस बेणे वापरतात. यामुळे उगवण कमी होते, पीक जोमदार नसते आणि असा उस रोग-किडींना लवकर बळी पडतो म्हणून ऊस उत्पादन आणि उत्पादकतेमध्ये घट आणणा-या रोग किडीचे नियंत्रण करण्यासाठी बेणे प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे.
त्यासाठी बाविस्टीन हे बुरशीनाशक वापरल्याने ऊसावर पडणारे रोग कमी होतात. उसाच्या बेण्यावर बाविस्टीन या बुरशीनाशकाचा प्रक्रिया करून दाखवली. कृषिकन्या तृप्ती आदमिले, श्रद्धा गायकवाड,अपेक्षा जाधव यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्नित रत्नाई कृषी महाविद्यालय, अकलूज आयोजित ग्रामीण जागरूकता कार्यानुभव अंतर्गत वाडीकुरोली ता.पंढरपूर जि. सोलापूर येथे व्यक्त केले.
त्याकरिता रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर.जी. नलवडे, समन्वयक प्रा. एस. एम. एकतपुरे, प्रा. एम. एम. चंदनकर आणि प्रा. एच. व्ही. कल्याणी आणि प्राध्यापक डॉ. डी एस ठवरे (प्लांट पॅथॉलॉजी विभाग) यांचे मार्गदर्शन लाभले. यासाठी गावातील शेतकरी उपस्थित होते.