सोलापूर प्रतिनिधी
नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेतील २१० दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार होते. व्यासपीठावर सेवानिवृत्त प्राचार्य विजयकुमार हुल्ले,मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हेत्रे,प्राचार्य रविशंकर कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे आदी उपस्थित होते.
प्रथम वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी व तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी दीपिका अंकम,ओंकार मंगरुळे,रोहित नडगेरी,दीपिका मिश्किन, मल्लिकार्जुन उंकी,विद्या सरवदे,तेजवंत कामूर्ती,सिद्धलिंग अतनुरे,विजयालक्ष्मी देगील, निकिता बाके,अंकिता कस्तुरी या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाले, शाळेतील शिक्षकांनी ज्ञानाच्या शिदोरीसह संस्कार दिला.आमच्यातील गुणवैशिष्ट्ये शोधून विविध उपक्रमातून आकार दिला अशी भावना व्यक्त केल्या.
संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार म्हणाले, विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकाचे बारकाईने वाचन करा.सोपे,माध्यम व काठिण्य पातळी ओळखून व्यवस्थितपणे पेपर सोडवा.शाळेचे व आई-वडिलांचे नाव लौकिक करा.शाळेविषयी प्रेम आपुलकी व जिव्हाळा तुमच्या मनात निर्माण झाल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक करुन परीक्षेत उज्वल यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिले.यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य विजयकुमार हुल्ले,प्राचार्य रविशंकर कुंभार,मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हेत्रे,पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, राजेंद्र मुलगे , बसवराज तेग्गेळी आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमादेवी कुंभार यांनी केले तर षडाक्षरी हिरेमठ यांनी आभार मानले.