सोलापूर प्रतिनिधी
अलिकडे न्यायव्यवस्थे मध्ये मोठे बदल होत आहेत, न्याय व्यवस्थेकडून सर्व सामान्य माणसाच्या अपेक्षाही वाढत आहेत.वकील हा न्याय व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे पिडीत व उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी वकिलांनी अधिक कार्यक्षमतेने पुढे येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन विवेक घळसासी यांनी केले, ते त्यांच्या वैयक्तिक कामासाठी गुरुवारी न्यायालयात आले असता त्यांनी वकील संघांला सदिच्छा भेट दिली. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड .सुरेश- बापू गायकवाड यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्या समवेत दैनिक स्वराज्याचे संपादक राकेश टयोळे, तरुण भारतचे श्री पेठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
घळसासी यांनी यावेळी वकील संघाची शहर व जिल्हयातील पटसंख्या त्याचबरोबर वकिल संघाचे व्यवस्थापन याविषयी माहिती जाणून घेतली . वकिल संघाच्या कार्यालयाला भेट दिली.
यावेळी ॲड .राजेंद्र फताटे ॲड.बाबासाहेब जाधव ॲड परवेश ढालायत ॲड .रवींद्र पाटील ॲड .संजय काळे ॲड.अनिता रणशृंगारे आदींची उपस्थिती होती.