पंढरपूर प्रतिनिधी
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संचलित रत्नाई कृषी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी त्यांनी बिगर माती शेती कशी करावी हे सांगितले .हायड्रोपोनिक शेती ही मातीशिवाय रोपे वाढवण्याची एक पद्धत आहे, त्याऐवजी वनस्पतींना आवश्यक पोषक द्रव्ये पुरवण्यासाठी पोषक युक्त पाण्याचे द्रावण वापरणे, वनस्पतींची मुळे पाण्याच्या द्रावणात निलंबित केली जातात आणि चांगल्या वाढीसाठी आवश्यक पोषक द्रव्ये योग्य प्रमाणात जोडली जातात. हायड्रोपोनिक शेती घरामध्ये किंवा घराबाहेर केली जाऊ शकते आणि पालेभाज्यापासून टोमॅटोपर्यंत ती विविध प्रकारच्या वनस्पती वाढवण्यासाठी वापरली जाऊ शकते.
प्राचार्य नलावडे, समन्वयक प्राधापक एस.एम. एकतपुरे, कार्यक्रम प्रा एम.एम चंदनकर, प्रा एच.व्ही कल्याणी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिकन्या तृप्ती आदमिले,प्रिती हांडे, गौरी कदम, श्रद्धा गायकवाड,अपेक्षा जाधव, निकिता ढगे, प्रियंका जायभाय, सेजल महाजन, प्राची जाधव यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले .