महाराष्ट्र राज्याचा अंतरिम 'तुटीचा अर्थसंकल्प'.. आगामी निवडणुकांकडे पाहून सर्वसामान्यांच्या पदरात गाजर टाकण्याचे काम - अभिजीत पाटील
पंढरपूर प्रतिनिधी
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री.अभिजीत पाटील यांच्या वतीने 'बजेट पे चर्चा' अर्थात महाराष्ट्र राज्याचा अंतरिम अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण डीव्हीपी स्क्वेअर, पंढरपूर येथे पंढरपूर मंगळवेढा येथील मान्यवरांसोबत पार पडले
पुढील निवडणुकांच्या अनुषंगाने नागरिकांची दिशाभूल करत केवळ गाजर दाखविणारा हा अर्थसंकल्प आहे. या बजेटमध्ये सर्वसामान्य नागरिक, शेतकरी त्यांच्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना दिसत नाही.
अर्थसंकल्पाच्या नावाखाली सरकारने ९ हजार कोटी महसुली तुटीचे बजेट मांडले आहे.. यापूर्वी देखील अशाच प्रकारे १७ हजार कोटी तुटीचा अर्थसंकल्प मांडला गेला.. आधीच्या कामांचे आणि घोषणांचे काय झाले? किती कामे पूर्णत्वास गेली? याचा आधी शासनाने खुलासा केला पाहिजे..
कुठलेही आर्थिक नियोजन नसताना केवळ पुढील काळात येणाऱ्या निवडणुका बघून लोकांच्या भावनांशी खेळण्याचे काम राज्य सरकारने केले आहे, असाच एकूण निष्कर्ष या अर्थसंकल्पाकडे बघून काढावा लागतो असे मत श्री.अभिजीत पाटील यांनी मांडले.
यावेळी पंढरपूर मा.नगराध्यक्ष सुभाष भोसले, काँग्रेसचे नेते, देवानंद गुंड पाटील, विठ्ठल सुतगिरणीचे चेअरमन दिनकर पाटील, राजेंद्र मोरे महाराज मा.नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर, पंकज देवकते, शिवसेना (उबाठा) रणजीत बागल, कर सल्लागार विश्वंभर पाटील, केदार कटेकर, उद्योजक यश उत्पाद, तुकाराम मस्के, राधेश बादले पाटील, सप्तसुंगी बँकेचे अमोल चव्हाण, गणेश बागल, प्रविण पाटील, शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, कार्याध्यक्ष मुझमिल काझी, पत्रकार प्रशांत मोरे, समाधान गाजरे, ॲड. संजय रोंगे, किरण घोडके, संदेश दोशी, ॲक्सिस बँकेचे विशाल साळुंखे, विद्यार्थिनी कोमल कौंडूभैरी, ऋतुजा फाळके, अक्षता धनवडे, मृण्मयी कोळसे, अहरम वाघमारे, नितीन पारसे, जमीर शेख यासह विविध क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक, लघुउद्योजक, डॉक्टर, सी.ए., सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेली मंडळी, विद्यार्थी, विविध क्षेत्रातील तज्ञ व नागरिक उपस्थित होते.
हा अर्थसंकल्प बजेट म्हणजे नागरिकांना गाजर दिल्याचा प्रकार आहे. सोलापूर विमानतळासाठी लगची कारखान्याची चिमणी पाडून देखील निधीची घोषणा केली नाही हि खेदाची बाब आहे. तसेच माझ्या पंढरपूर मंगळवेढ्यातील उपसा सिंचन योजनेसाठी गेल्या दोन वर्षांपूर्वी अत्यावश्यक तरतूद करून देण्याची घोषणा केली महात्मा संत बसवेश्वरांचे स्मारक व संत चोखामेळा यांच्या स्मारकासाठी देखील निधी उपलब्ध करून देण्याचे तत्कालीन अर्थमंत्री यांनी घोषणा केली होती परंतू निधीच दिला नसल्याने कोणतेही काम झालेच नाही. पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार हे भाजपचे असून रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला म्हणजे बोळवण केल्याचा आरोप अभिजीत पाटील यांनी केला आहे.
अभिजीत पाटील.चेअरमन श्री विठ्ठल सह.साखर