कवठे महांकाळ प्रतिनिधी
कोंगनोळी ता. कवठे महांकाळ येथे श्री क्षेत्र आयोध्या वरून आलेल्या श्री राम मंगल अक्षदा कलशाची ग्रामप्रदक्षिणा यात्रा मोठ्या प्रमानात पार पडली.
22 जानेवारी 2024 या शुभ दिवशी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र आयोध्या येथे बांधण्यात आलेल्या नवीन मंदिराच्या तळमजल्यावरील गर्भ गृहात प्रभू श्रीरामांची बाल स्वरूपातील नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या निमित्ताने देशभरातून श्रीराम भक्त आयोध्याला येणार आहेत. या सोहळ्याचे निमंत्रण म्हणून देशातील प्रत्येक गावोगावी श्री राम मंगल अक्षदा कलश फिरवण्यात येणार आहे. या निमित्ताने कोंगनोळी येथे श्री राम मंगल अक्षदा कलशाची ग्राम प्रदक्षिणा यात्रा मोठ्या प्रमाणात पार पडली. ही ग्राम प्रदक्षिणा यात्रा मा. पाटबंधारे राज्यमंत्री मा. अजितरावजी घोरपडे सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली ढोल, वारकरी संप्रदाय, भजन म्हणत पारंपारिक वाद्यांमध्ये पार पडली. या मंगल अक्षदा कलेश यात्रेची सुरुवात करण्यात आली यावेळी अजितराव घोरपडे इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी यांनी श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांची वेशभूषा साकारली. आणि जय श्रीराम चा जयघोष अशा आनंद आणि उत्साह पूर्ण राममय वातावरणात अयोध्याहुन आलेल्या अक्षतांचे पूजन करीत ग्रामदैवत कोंगाई देवीच्या मंदिरापासून पालखी मधून कलश यात्रा काढण्यात आली. यावेळी महिलाही डोक्यावर कलश घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या, यावेळी पालखीचे ठीक ठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले. ग्राम प्रदक्षिणा यात्रा पूर्ण झाल्यानंतर हा कलश कोंगाई देवीचा मंदिरामध्ये 22 तारखेपर्यंत दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. गावातील सर्व ग्रामस्थांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले. तसेच 15 जानेवारीपर्यंत कोंगनोळीतील प्रत्येक घरात निमंत्रण पत्रक व प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिमा व अक्षता वाटप करण्यात येणार आहे. तसेच 22 जानेवारी या दिवशी ज्या पद्धतीने अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम विधी पार पडणार आहे त्याच पद्धतीने कोंगाई मंदिरामध्ये देखील भजन कीर्तन पूजा करून शंख नाद करून प्रसाद वाटप करण्यात येणार आहे. तसेच "श्रीराम जय राम जय जय राम" या विजय महामंत्राचा 108 वेळा सामूहिक जप करण्यात येणार आहे. व आयोध्या मधील पार पडणारा विधी कोंगनोळीकरांसाठी थेट प्रक्षेपित करण्यात येणार आहे. प्राणप्रतिष्ठापणे च्या दिवशी रस्ता नंतर संध्याकाळी देवांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या आपल्या घरामध्ये घरासमोर रांगोळी काढून दिव्यांच्या माळा लावून सजावट करावी गावातील प्रत्येक घरामध्ये दीपोत्सव साजरा करावा. ज्या पद्धतीने आपण दिवाळी साजरी करतो त्या पद्धतीने हा सोहळा साजरा करावा असे आवाहन माननीय अजितरावजी घोरपडे सरकार यांनी ग्रामस्थांना केले.
यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायती सर्व सदस्य, पोलिस पाटील, सर्व संस्थांचे पदाधिकारी न्यू इंग्लिश स्कूलचे, इंग्लिश मिडीयम स्कूल चे शिक्षक आजूबाजूच्या गावाहून आलेले ग्रामस्थ, कोंगनोळी गावातील ग्रामस्थ महिला सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात पार पडला.