मुंबई प्रतिनिधी
यवतमाळ जिल्ह्यातील "तरनोळी" या गावी राहत असलेल्या व "शब्दसखा" या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या कवी अजय रमेश चव्हाण यांच्या "विठ्ठलाची वारी" या कवितेची अमळनेर येथे होत असणाऱ्या ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निवड झाली असून त्यांना दिनांक ०३/०२/२०२४ रोजी सत्र क्रमांक ९ मध्ये आपल्या कवितेच्या सादरीकरणासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
त्यानिमित्त "वऱ्हाड साहित्य मंच दारव्हा - दिग्रस - नेर", याडीकार पंजाबराव चव्हाण ( सुप्रसिद्ध गोरबंजारा साहित्यिक ) विवेक राठोड,मिलिंद कळसकार, जावेद शेख, सुप्रसिद्ध लेखिका सौ.संगीताताई ठलाल,प्रमोद सूर्यवंशी, मा.कविमित्र नाना कुमावत,सौ. विद्या चव्हाण, आई यशोदा चव्हाण, सुधीर राठोड,विशाल राठोड, सुमित राठोड, प्रशांत चव्हाण व समस्त साहित्यिक मित्र व गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला असून त्यांचे अभिनंदन केले आहे.