पंढरपूर प्रतिनिधी
औंज बंधाऱ्यावरील शेतकऱ्यांना कर्नाटक सरकारची 24 तास वीज आणि आपल्या पंढरपूर मधील शेतकऱ्यांना 2 तास वीज पुरवठा......शेजारी तुपाशी आणि घरची माणसं उपाशी असा कारभार सुरु आहे
उजनी धरणातून सोलापूर व भीमा नदी काठच्या शेतकऱ्यांना पाणी सोडण्यात आले होते पाणी सोलापूर ला पोहचून आठवडा झाला तरीही गुरसाळे व पंढरपूर बंधाऱ्यावर आसलेल्या नदी काठच्या गावाचा वीज पुरवठा खंडित करून फक्त दोन तास सुरु ठेवला आहे.
त्यामुळे नदी काठच्या 10-12 गावातील पिण्याच्या,जनावराच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असुन आता तोंडाशी आलेली शेतकऱ्याची पिके असतानाही पाण्यावाचून करपू लागली आहेत उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे त्यामुळे जनावरांना पिण्यासाठी व शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असते परंतु वीज पुरवठा खंडित केल्यामुळे या सगळ्या गोष्टी अडचणीच्या करत आहेत कर्नाटकच्या शेतकऱ्यांना सरकार चोवीस तास वीज पुरवठा करतो त्यामुळे आज बंधाऱ्यातून आरक्षित असताना सुद्धा ते शेतकरी 24 तास पाणी उपसा करत आहेत.
परंतु आपल्या पंढरपूर मधील शेतकऱ्यांना मात्र प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून वीज पुरवठा खंडित करून वेठीस धरले जात आहे शेतकऱ्यांना वीज पुरवठा द्यायचा नसेल तर तसे शासनाने जाहीर करावे व शेतातल्या सर्व पिकाची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून मग खुशाल लाईट बंद ठेवावी आमची काही हरकत नाही.