करकंब येथे आईवडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ जोपासला जातोय सांस्कृतिक वारसा
करकंब नगरीत विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातून बहरली बालरंगाची उधळण
करकंब प्रतिनिधी
कै.पुष्पा नारायण दुधाणे आणि पुष्पा नारायण दुधाणे यांच्या द्वितीय पुण्यस्मरणा निमित्ताने नादब्रह्म कला फाउंडेशन यांचे वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या दोन्ही स्पर्धेला करकंब आणि करकंब पंचक्रोशीतील ३२५ विद्यार्थी विद्यार्थिनीनी उदंड प्रतिसाद देत ही स्पर्धा यशस्वी केल्याचे आयोजक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी सांगितले.
यावेळी ह्या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.सुरुवातीला कलासाधना पंढरपूर मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत महाजन, डॉ.किरण बहिरवाडकर, रजनीताई देशमुख, कल्पनाताई देशमुख,सारिका पुरवत, वैशाली देशमुख,प्राचार्य किसन सलगर, प्राचार्या सौ विजया उंडे, महादेव पुजारी,पत्रकार सुर्यकांत बनकर परीक्षक सागर थिटे ,सोमेश्वर यंपे, दत्तात्रय खंदारे आयोजक ज्ञानेश्वर दुधाणे, गणेश दुधाणे, देवकी दुधाणे अनुपमा दुधाणे यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन झाले,त्यावेळी श्रीकांत महाजन म्हणाले की या स्पर्धेमधून सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनींना भविष्यकाळात निश्चितच फायदा होणार असून.सर्व विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग करत अभ्यासा बरोबर इतर कलागुणांना द्यावा जेणेकरून कामात बदल ही होईल आणि कलाही आत्मसात होईल.कला ही जीवनाची सावली बनून राहण्यासाठी कलेत सातत्य राहिले तर निश्चितच समाधान वाटते.
यावेळी डॉ .बहिरवाडकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करत शुभेच्छा देत सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनींना चांगला सहवास लाभला तर विद्यार्थी निश्चितच चांगला नागरिक बनतो सांगितले,बनकर सरांनी ही विद्यार्थ्यांच्या जीवनात असेच रंग भरावे सांगून शुभेच्छा दिल्या दुधाणे परिवार तन्मयतेने सगळे उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासत आसल्याचे सांगितले,प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते वक्तृत्व स्पर्धा लहान गटात प्रथम क्रमांक संध्या फाळके द्वितीय क्रमांक श्रावणी भोसले तृतीय क्रमांक तनिष्का टकले हिने पटकावला तर मोठ्या गटात प्रथम क्रमांक आदित्य मोरे द्वितीय क्रमांक वैष्णवी व्यवहारे तृतीय क्रमांक वेदिका टकले या विद्यार्थ्यांनी पटकाविला तसेच चित्रकला स्पर्धेत लहान गटात प्रथम क्रमांक कार्तिक अनिल पवार,द्वितीय क्रमांक तेजश्री लोंढे तृतीय क्रमांक दुर्वा माळी तर मोठ्या गटात प्रथम क्रमांक माही हत्तरगे द्वितीय क्रमांक रितिका टकले तृतीय क्रमांक ऋतुजा कवडे यांनी पटकावून रोख बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी करकंब केंद्रातील सर्व शिक्षक शिक्षिकांच अनमोल सहकार्य लाभले.
दोन्ही स्पर्धेत मिळून जवळपास ३२५ विद्यार्थी विद्यार्थ्यांनीनीं सहभाग नोंदविला होता.परीक्षण सागर थिटे सोमेश्वर यंपे दत्तात्रय खंदारे यांनी केले.या स्पर्धेचे सुंदर आयोजन नादब्रह्म कला फाउंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर दुधाणे, गणेश दुधाणे यांनी केले होते.
प्रास्ताविक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी तर आभार सोमेश्वर यंपे यांनी मानले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुवर्णा टकले, सुनंदा गुळमे,अनिता महामुनी,स्नेहल आमले, रेश्मा कवडे, वृषाली बोधे,आशा टकले, शेटे मॅडम, सुरैय्या आतार,सोमनाथ पवार, जयवंत कापसे,इरेवाड सर, गणेश पिसे, बापू खारे, भैय्या पवार, श्रीराम टकले,प्रसाद दुधाणे,आदींनी अधिक परिश्रम घेतले.