पंढरपूर प्रतिनिधी
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.छगनराव भुजबळ हे कार्यक्रमाचे निमित्ताने पंढरीत आले असता. काँग्रेस ग्राहक संरक्षण विभागाचे जिल्हाध्यक्ष संग्राम जाधव यांनी अतिशय महत्वाचे निवेदन सादर केले.
या देण्यात आलेल्या निवेदनात केशरी व पिवळे रेशन कार्ड धारकांना सरसकट धान्य पुरवठा सुरू करणे बाबतची महत्वपूर्ण मागणी केलेली आहे. यामुळे अनेक वंचित गोरगरिबांना फायदा होणार आहे.
सरकारकडून सध्या धान्य पुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये अनेकांनी मुदतीत आपले अन्न सुरक्षा योजनेमधून मागणी न झाल्याने धान्य मिळू शकत नाही. त्यासाठी अन्न सुरक्षा योजनेसाठी ज्यांना धान्य मिळणे गरजेचे आहे. त्यांच्यासाठी अन्न सुरक्षा योजनेसाठी परत एकदा अर्ज स्वीकारण्यासाठी मुदत देण्यात यावी. यामुळे अनेक गोरगरीब जनतेला स्वतः दरात धान्य मिळेल. यासाठी आपल्या पुरवठा विभागाला त्याबाबतच्या सूचना देऊन, अनेक गोरगरीब जनतेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी उभा करावा असेही निवेदनात सांगितले आहे.
सदरचे निवेदन देताना यावेळी आबासाहेब खारे, चंद्रशेखर जाधव, बापू भंडारे, पंकज देवकाते, अमोल माळी, बापू वसेकर उपस्थित होते.