पत्रकार सुरक्षा समितीचे शंकर माने यांचा इशारा
सोलापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील अल्प अवधीत लोकप्रिय झालेल्या लोकशाही या वृत्तवाहिनीवर बातमी लावण्यवरून केंद्र सरकार ने तीस दिवस प्रसारण बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या केंद्र सरकार च्या कृतीचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने निषेध व्यक्त केला असून पत्रकार हा लोकशाही चा चौथा स्तंभ असून अश्या निर्भीड व सडेतोड वृत्त वाहिनी वरील बंदी बेकायदेशीर असून पत्रकारांचे मूलभूत हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहेत त्याच बरोबर वस्तूनिष्ठ बातम्या लावण्याऱ्या पत्रकारांची मुस्कटदाबी होत असल्याने पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली असून पत्रकारिता करायची कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र सरकार ने महाराष्ट्र राज्यातील लोकप्रिय वृत्तवाहिनी लोकशाही वरील बंदी तात्काळ उठवण्यात यावी अन्यथा पत्रकार सुरक्षा समिती रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र संघटक शंकर माने यांनी जिल्हा प्रशासन ला दिला आहे
लोकशाही वृत्तवाहिनी वरील बंदी म्हणजे पत्रकारांचा आवाज दाबणे
लोकशाही वृत्तवाहिनी वर बातमी लावण्यावरून तीस दिवस प्रसारण बंदी केंद्र सरकार ने घातली असून केवळ कागदपत्रे अपूर्ण असल्याचे कारण देऊन चॅनल बंद ठेवण्यास भाग पाडणे कितपत योग्य आहे?असा सवाल पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र संघटक शंकर माने यांनी प्रशासनास विचारला असून ही पत्रकारांची मुसकटदाबी असल्याचे म्हटलं आहे शंकर माने सोलापूर चे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.