पाठीमागून वार करणारे हे मराठे असूच शकत नाहीत या समाजकंटकाच्या मागे विरोधकांचे खूप मोठे षडयंत्र असल्याचा अस्मिता ताई गायकवाड यांचा दावा .
सोलापूर प्रतिनिधी
शिवसेनाप्रमुख व महाराष्ट्राचे माजी लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल विकास पवार आणि सागर शिंदे यांनी विटंबनात्मक पोस्ट टाकली होती त्याचप्रमाणे रविवारी 10 डिसेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत आले असता यांच्या बद्दल अपशब्द वापरणे तसेच डोके फोडण्याची भाषा केली असून ह्या पाठीमागे कोणाचे षडयंनत्र आहे हे शोधून काढून त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करून तात्काळ कडक कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उपनेत्या अस्मिता ताई गायकवाड यांनी पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
2024 लोकसभा आणि विधानसभा निवडणूक होणार असून या दरम्यान सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक नेत्यांचे दौरे होणार आहेत या समाजकंटकांना वेळीच कडक कारवाई करून कायदा व सुव्यवस्था बिघडू न देण्याचे काम जबाबदारी शाशन व प्रशासन यांच्यावर आहे.उद्धवजी ठाकरे साहेब व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जनतेतून प्रचंड समर्थन मिळत आहे त्यामुळे विरोधकांची पाया खालची वाळू घसरली असून अशा समाजकंटकांना पुढे करून हे घाणेरडे प्रकार करण्याचे षडयंत्र जे कोणी करत आहेत त्याचा त्वरित शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली नाही तर सोलापुरातच नव्हे तर महाराष्ट्रात शांतता व सुव्ययवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होऊन अनर्थ ओढावेल. यापुढे शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या विरुद्ध कोणतेही कट कारस्थान खपवून घेतले जाणार नाही त्याचे जे गंभीर परिणाम होतील त्यांला संपूर्ण जबाबदारी शासन व प्रशासनावर राहील असा इशारा यावेळी महिला आघाडीच्या वतीने देण्यात आला.मी स्वतः ९६ कुळी मराठा आहे शिवाजी महाराजांचे वशंज अशे पाठीमागून वार करत नाहीत अशेही त्या म्हणाल्या.
याप्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या शहर संघटिका जोहरा रंगरेज , उपजिल्हा संघटिका ज्योती माळवदकर , प्रीति नायर ,स्वाती रुपनर ,उपशहर संघटिका सुरेखा वाडकर ,कविता पवार ,माया थोरात ,रेखा राठोड आदी उपस्थित होते.