पंढरपूर प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये बुधवार दिनांक २० डिसेंबर २०२३ रोजी महाविद्यालयाचे संवेदनशील प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यादरम्यान संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रा. नीता कुलकर्णी, प्रा. अंजली पिसे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. चेतन पिसे, पब्लिकेशन्स डीन डॉ. संपत देशमुख, सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन अभिवादन करण्यात आले.
समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्रातील संत परंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत.लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावतीजवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले.
यावेळी महाविद्यालयातील प्रा. अविनाश हराळे, प्रा. दत्तात्रय कोरके, प्रा. उदय फुले, प्रा. सुजित राठोड, प्रा. नितीन खपाले, प्रा. अमोल गोडसे, पांडूरंग परचंडे, नवनाथ माळी आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांकडून संत गाडगे महाराज यांना अभिवादन करण्यात आले.