सद्गुरू काशिनाथ महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात संपन्न
भाळवणी प्रतिनिधी
प्रतिवर्षाप्रमाणे सद्गुरु काशिनाथ महाराज यांच्या ५० व्या पुण्यतिथी निमित्ताने ख्यातनाम राष्ट्रीय कीर्तनकार संदीप बुवा मांडके यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते.
सुरुवातीला निरुपणासाठी संत रामदास स्वामी यांच्या मनाच्या श्लोकावर मनी रामनामी प्रिती धरावी निरुपण करताना संसारात आपण अनेकांवर प्रेम करतो पण ते प्रेम निस्वार्थी भावनेने करत असल्याने शाश्वत सुख मिळत नाही.त्यामुळे संसार दुःख मुळ आहे.यातुन तरुण जाण्यासाठी रामनामाचे नामस्मरण कलियुगात उध्दारक असून जीवन सुफळ करते.त्यासाठी मनुष्याने जीवनात कशाचा गर्व करु नये.आपल्या पेक्षा अनेक जण सव्वाशेर असतात हे लक्षात ठेऊन भगवंत नामस्मरण करीत आपला काळ घालवावा सांगितले.यावर अनेक दृष्टांत देत उत्तररंगामध्ये बळीराम दादा,सत्यभामा,आणि गरुडाचे गर्वहरण हनुमंताच्या रुपात कशाप्रकारे केले आणि कृष्णकाळात रामरायाचे दर्शन कसे घडवले अतिशय सुंदर आख्यान सांगून भाळवणीकर भक्तभाविकांना मंत्रमुग्ध केले.त्यांना तितकीच अप्रतिम साथसंगत तबला ज्ञानेश्वर दुधाणे हार्मोनियम वैभव केंगार यांनी केली.
अप्रतिम गायन, अभ्यासपूर्ण निरुपण,अभिनय, विनोदबुद्धी,अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या संदीप बुवा मांडके यांनी भाविकांची मने जिंकली आणि प्रत्येक वर्षी या तिथीला कीर्तन करण्याचे आमंत्रण ही दिले.
रविवारी पहाटे ६:००वा.सद्गुरु काशिनाथ महाराज यांच्या समाधीवर भजन करत पुष्पवृष्टी करण्यात आली.यावेळी काशिनाथ महाराज शिष्य मंडळी आणि भाळवणी भक्तभाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दुपारी महाप्रसादाचे वाटप करत पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला.दोन दिवसाचा उत्सव यशस्वी करण्यासाठी शिष्य परिवार आणि अरुणोदय सेवा न्यास यांचे सर्व पदाधिकारी राज पाटील,सुदाम कलढोणे, कल्याण कलढोणे, प्रभाकर शिंदे,धनंजय धोत्रे,अमोल कारंडे,श्रीराम तारळकर,विश्वास बोधे पांडुरंग शेवाळे,पोपट इंगोले, धनाजी डंबाळ, श्रीराम तरकसे, राजेंद्रसिंह निंबाळकर आदींनी अधिक परिश्रम घेतले.