लवकरच महत्त्वाच्या राजकीय पक्षाची जबाबदारी मिळण्याची शक्यता
पंढरपूर प्रतीनीधी
अनेक वर्षापासून समाजकारणात अग्रेसर असलेल्या प्रियंका परांडे यांनी समाजकारणाला राजकारणाची जोड देण्याचे ठरवले आहे. महिला सक्षमीकरणात भक्कमपणे काम केलेल्या प्रियंका परांडे यांचा हा निर्णय राजकीय पक्ष वाढीसाठी फायदेशीर ठरणार आहे.
प्रियंका परांडे या मूळ पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली या गावच्या आहेत. त्यांचे शिक्षण डिप्लोमा इंजीनियरिंग झाले आहे. कॉलेज जीवनापासूनच त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. याचवेळी अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची त्यांची तयारी कॉलेज जीवनातच दिसून आली आहे. बार्शी येथील कॉलेजमधील गैरव्यवहाराबाबत त्यांनी उठवलेला आवाज जिल्हाभर गाजला होता. यावेळी त्यांनी कॉलेज विरोधात एम.एस.बी.टी.इ. बोर्ड पुणे, डी.टी.इ.बोर्ड मुंबई, पोलीस कमिशनर, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी देऊन कारवाई करण्यास भाग पाडले होते.
पंढरपूरसह अनेक भागात २०१४ सालापासून, सर्वधर्मीय वधूवर सूचक केंद्र चालविले आहे. वेळोवेळी वधूवर पालक परिचय मेळावेही भरवले आहेत. यामुळे त्यांचा दांडगा जनसंपर्क वाढला आहे. मासाहेब जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, यांच्या जयंतीनिमित्ताने महिला सक्षमीकरण आणि महिलांमध्ये आत्मविश्वास जागृत करण्यासाठी आजवर विविध कार्यक्रम राबवले आहेत. सार्वत्रिक निवडणुकांच्या माध्यमातून इलेक्शन कॅम्पिंगचाही अनुभव त्यांच्याकडे आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती इत्यादी निवडणुकांचा अभ्यास त्यांना चांगलाच अवगत आहे.
यापूर्वी त्यांनी भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती संघटना
या संघटनेचे युवती आघाडी प्रदेशाध्यक्ष पद भूषवले आहे. या संघटनेच्या माध्यमातून शासकीय तसेच अशासकीय विविध विषयांमध्ये लक्ष घालून त्यांनी समाजाला मोबदला मिळवून देण्याचे काम केले आहे.
प्रियंका परांडे या सध्या महाराष्ट्र राज्याच्या ग्राहक समिती संघटनेमध्ये महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मोठे काम केले आहे. महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान, गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप, शासकीय कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान, वार्षिक स्नेहसंमेलन मेळावे, यासह समाजउपयोगी कार्यक्रम त्यांनी या संघटनेच्या माध्यमातून राबवले आहेत.
आषाढी वारीमध्ये पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांना फराळाचे वाटप, याचप्रमाणे गरजेच्या वस्तूंचे वाटप करून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. खासदार धनंजय महाडिक यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी विविध सामाजिक बांधिलकी जोपासली होती.आशा या नेतृत्वाला कोणता पक्ष जबाबदारी देणार याकडे लक्ष लागून राहिले आहे