श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, सुस्ते प्रशालेत
पंढरपूर प्रतिनिधी
दि. 29 व 30 नोव्हेंबर या दोन दिवसीय केंद्र स्तरीय नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत केंद्र स्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य प्रा.सुधाकर पिसे, पर्यवेक्षक रणजित शिनगारे व सुभाष अधटराव यांचे हस्ते करण्यात आले.सदर कार्यशाळेस उपस्थित मान्यवरांचे व शिक्षक-बंधू भगिनींचे स्वागत प्रशालेचे प्राचार्य प्रा.सुधाकर पिसे व पर्यवेक्षक रणजित शिनगारे यांचे हस्ते करण्यात आले.राजकुमार पाटील यांनी साक्षरतेबद्दल विचार व्यक्त केले.प्रविण घाडगे यांनी निरक्षर राहिल्याने होणारे नुकसान व दुष्परिणाम याबद्दल माहिती दिली
.तर प्राचार्य पिसे व सुभाष अधटराव गुरुजी यांनी केंद्र शासनाच्या नवभारत साक्षरता अभियान या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करतानाच अशाप्रकारच्या नवभारत साक्षरता अभियानाचे व कार्यशाळेचे आयोजन करण्याचा शासनाचा हेतू व त्याचा समाजासाठी होणारा शैक्षणिक फायदा याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहशिक्षक प्रथमेश गावडे यांनी केले.तर आभार कलाध्यापक श्रीकांत चंदनशिवे यांनी मानले.यावेळी शशिकांत चव्हाण, विक्रांत सर्वगोड,श्री पाटील आदी शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.