सोलापूर प्रतिनिधी
पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेल्याअनेक वर्षांपासून
*जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना*
*राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी*
*यादीवर नसलेल्या सर्वच वृतपत्रानां पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती*
*राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता*
*प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा*
*पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना*
*अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे*
*पत्रकारांच्या वाहनानां टोल मधून सूट देणे*
*पत्रकारांच्या पाल्ल्यासाठी शिष्यवृत्ती देणे*
*खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी*
*पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण*
या सह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती आंदोलन उपोषण निवेदन त्याच बरोबर पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती राज्यसरकार कडे पत्रव्यवहार करत असून राज्य सरकार पत्रकारांच्या प्रश्नावर डोळेझाक करत आहे. राज्यातील पत्रकारांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून राज्य सरकार ला पत्रकारांच्या प्रश्नाचा विसर पडलेले दिसत आहे. राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर राज्य सरकार चे लक्ष वेधण्यासाठी लवकरच राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर आंदोलन छेडण्यात येईल अशी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश उपाध्यक्ष बाळकृष्ण सदाफुले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
*पत्रकारांच्या प्रश्नावर राज्य सरकार गंभीर दिसत नाही*
महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांचे प्रश्न अतिशय गंभीर व बिकट असून पत्रकारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री गंभीर नाहीत असा थेट निशाणा राज्य सरकार वर साधला असून पत्रकारांचे लवकरात लवकर सोडवा अन्यथा आंदोलन ला सामोरे जा असा इशारा पत्रकार सुरक्षा समितीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाळकृष्ण सदाफुले यांनी दिला आहे.
*पत्रकारांचे प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती गंभीर*
पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती वेळोवेळी आंदोलन उपोषण निवेदन करून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असून राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती गंभीर असून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवडल्या शिवाय आपण स्वस्थ बसणार नाही अशी स्पष्ट ग्वाही पत्रकार सुरक्षा समितीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बाळकृष्ण सदाफुले यांनी राज्यातील पत्रकारांना दिली आहे.