पंढरपूर प्रतिनिधी अमोल कुलकर्णी
जिल्हा ग्रामीण तीर्थक्षेत्र असणाऱ्या खर्डी येथील श्री सिताराम महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम म्हणजे भंडारा दिनांक 11 डिसेंबर रोजी लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला.दुपारी बाराच्या वेळेस आरती नंतर पुष्पवर्षाव करण्यात आला. यावेळी गावात आलेल्या खेळणी विक्रेते,घरगुती वस्तू विक्रेते, मेवामिठाई आणि प्रासादिक दुकानांच्या व्यापाऱ्यांचे नियोजन गावातील सर्व रस्त्यावर केले असल्याने गाव गर्दीने फुलून गेले होते. पुण्यतिथीच्या वेळेस जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनीही दर्शन दर्शनाचा लाभ घेतला. यावेळेस भाविकांना अन्नदान करण्यात आले.श्री सिताराम महाराज समाधी मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने आलेल्या भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. दिनांक 12 रोजी पालखीची नगरप्रदक्षिणा करण्यात आली.13 डिसेंबर रोजी 3 वाजता गाणगापूरसाठी पायी प्रस्थान केले.दत्त जयंती रोजी गाणगापूर येथे जाणार असल्याची माहिती पालखी ट्रस्ट प्रमुख विकास कुलकर्णी यांनी दिली.पंच कट्यावर यावर्षी भरपूर शिधा उपलब्ध झाल्याची माहिती विश्वस्त हरिभाऊ कुलकर्णी,लक्ष्मण तात्या रोंगे यांनी दिली.
"चोरट्यांचा डल्ला"
भंडाऱ्या दिवशी झालेल्या गर्दीत अनेक छोट्या मोठया चोऱ्या घडून आल्याने भाविकांना फटका बसला एका वृद्ध महिला भविकेचे तीन तोळ्यांचे मंगळसूत्र चोरी झाल्याने एवढी पोलिसांची कुमक मागवूनही उपयोग काय झाला अशी चर्चा सर्वत्र होत आहे.
"आरत्या बंद करणार"
चोऱ्यांचे प्रमाण बंद करण्यासाठी
गुरुवार,अमावस्या आणि पुण्यतिथी काळात जवळपास एक तास आरत्या नाहक दुबार होणाऱ्या आरत्या बंद करून केवळ दोन आरत्या घ्याव्यात अशी मागणी भविकातून होत आहे.याबाबत लवकरच समाधी मंदिर ट्रस्ट खर्डी निर्णय घेणार आहे.