राज्यस्तरीय काव्य महोत्सव संपन्न ..
कोल्हापूर प्रतिनिधी
नाती , मन जपताना अनेक गोष्टींचा पैलू सांभाळून भावना व्यक्त कराव्या लागतात . याच सादरीकरणातून कवींनी भावनांचा काव्यातून बांध फोडला असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी प्रा. बाळासाहेब तोरस्कर यांनी केले . जायंटस् ग्रुप ऑफ कोल्हापूर मेट्रो , लेखन आणि मी साहित्य समूह , भारतीय साहित्य सांस्कृतिक मंच , जेष्ठ नागरीक सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुस्तक प्रकाशन व राज्यस्तरीय काव्य महोत्सव या कार्यक्रमात ते अध्यक्षपदावरून बोलत होते .
ते पुढे म्हणाले कविता म्हणजे अंतर्मनातील संवेदनांची स्पंदने, आनंदाचे उमाळे, सृष्टीच्या पलिकडील सृष्टी. जनमनाचा आरसा असते कविता .
राज्य पुरस्कार साहित्यिक श्याम कुरळे , केंद्रीय समिती सदस्य प्रमोद शहा , डॉ . राजकुमार पोळ या प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते साहित्य संपदा दिवाळी अंकाचे तसेच बंध भावनांचे कथा संग्रह, भाव मनीचे कविता संग्रह , सुवर्ण काव्य या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले .
या काव्य महोत्सवात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून सुमारे ८० कवींनी सहभाग नोंदविला होता . त्यामध्ये कोल्हापूर व पुणे येथील तसेच सर्वच कवींचे सादरीकरण उत्तम झाले . कवींना सहभाग प्रमाणपत्र , सन्मानचिन्ह , गुलाब फुल देऊन सन्मानित करण्यात आले .
रामदास रेवणकर , विशाल सिरसट , सुरेश खांडेकर , विजय जायभावे , प्रा . मधुकर पाटील , जयंत लंगडे , अशोक भोईटे, रोहिणी माया रामू वाघमारे , प्रकाश पाटील हे अतिथी उपस्थित होते .
शिवाजी यादव , रमेश पाटील , मोहन गावडे , सुवर्णा पवार , डॉ शिवाजी हिलगे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते .सुत्रसंचालन अशोक भोईटे , श्रीशैल सुतार , अनुष्का गोवेकर यांनी तर रमेश पाटील यांनी आभार मानले.