पंढरपूर प्रतिनिधी
केंद्रसरकारच्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचे 23 नोव्हेंबर 2024 पासून आयोजन करण्यात आले आहे. याव्दारे नागरिकांना केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ आणि माहिती देण्यात येत आहे. पंढरपूर शहरात विकसित भारत संकल्प यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून, विकसित भारत संकल्प यात्रेत नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी केले आहे.
जिल्हा परिषद स्तरावर सर्व ग्रामीण भागात आणि महानगरपालिका क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रेचा प्रचार व प्रसार सुरू आहे. तसेच नगरपरिषद क्षेत्रात देखील विकसित भारत संकल्प यात्रेचा प्रचार आणि प्रसार करून शासनाच्या वतीने राबवित असलेल्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यात येतआहे.
पंढरपूर शहरात विकसित भारत संकल्प यात्रा दि. 28 डिसेंबर रोजी दाखल झाली असून, यात्रेचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मुख्याधिकारी प्रशांत जाधव, उपमुख्याधिकारी अँड. सुनील वाळूजकर , पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक प्रणव परिचारक, यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विविध योजनांचे लाभार्थी नव्याने योजनांमध्ये सहभागी होणारे नागरिक उपस्थित होते.
लोकमान्य विद्यालय पंढरपूर येथे विकसित भारत संकल्प यात्रेद्वारा उपस्थित नागरिकांना विविध शासकीय योजनांच्या लाभाबाबत माहिती देण्यात आली. तसेच प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजनेअंतर्गत प्राथमिक स्वरूपात १० पथविक्रेत्यांना धनराशी मंजुरीचे प्रमाणपत्र देण्यात आले. या योजनेअंतर्गत आतापर्यंत पंढरपूर शहरातील एक हजार ३० नागरिकांना लाभ देण्यात आला असून, या योजनेत संबंधितांना व्याज दारात सबसिडी देण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव जाधव यांनी सांगितले. तसेच जास्तीत-जास्त नागरिकांनी विकसित भारत संकल्प यात्रेत सहभाग नोंदवून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी केले.
विकसित भारत संकल्प यात्रेद्वारा शहरातील लोकमान्य विद्यालय, गौतम विद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, हुतात्मा चौक या ठिकाणी शासनाच्या विविध योजनांचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. यामध्ये शासनाच्या आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, पंडीत दीनदयाल अंत्योदय योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री उजाला योजना, जनधन योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, पोषण आहार योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, भारतीय डाक विभागातील योजना या विविध योजनांची माहिती व लाभ देण्यात येत आहे.
पंढरपूर येथील गौतम विद्यालय येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वसंत पेठ भागातील नागरिकांसाठी कार्यक्रम आयोजित केला होता. माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत विकसित भारत संकल्प यात्रेत उपस्थितांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ ज्या लाभार्थ्यांना अद्यापही मिळालेला नाही त्यांच्यापर्यंत योजनांची माहिती ‘विकसित भारत संकल्प’ यात्रा या मोहिमेच्या माध्यमातून पोचविण्यात येत आहे. योजनांच्या लाभांपासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास या यात्रेच्या माध्यमातून प्रोत्साहित करण्यात येत आहे.विविध शासकीय योजनांचा लाभ जास्तीत-जास्त नागरिकांना व्हावा यासाठी संबधित विभागाने प्रयत्न करावेत तसेच नागरिकांनीही विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष वामनराव बंदपट्टे, लक्ष्मण शिरसाट, माजी नगरसेवक अनिल अभंगराव, सुनील सर्वगोड,राजू सर्वगोड, इब्राहिम बोहरी, विक्रम शिरसट, अमोल डोके, बसवेश्वर देवमारे, नितीन धोत्रे, रवींद्र साळे, उमेश सर्वगोड,दत्ता शिंदे, अक्षय वाडकर, उपमुख्याधिकारी अँड.सुनील वाळूजकर,नोडल ऑफिसर अस्मिता निकम, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, नागनाथ तोडकर तसेच नेताजी पवार, करअधिक्षक सुप्रिया शिंदे, जानबा कांबळे, चेतन चव्हाण, दर्शन वेळापूरे संतोष कसबे, योगेश काळे यांच्यासह नागरिक, बचत गटाच्या महिला, आशा वर्कर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी विकसित भारत प्रतिज्ञा घेतली.