सोलापूर प्रतिनिधी ॲड . शिवाजी कांबळे
छावा क्रांतिवीर सेनेचा सोलापूर जिल्ह्यामध्ये पदग्रहण सोहळा व मार्गदर्शन मेळावा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न सिद्धेश्वर नगरीमध्ये छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला हार घालून छावा क्रांतिवीर सेनेचा मेळाव्याला सुरुवात करण्यात आली.सुरुवातीला शासकीय विश्राम्र या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत सोलापूर जिल्ह्यामध्ये संघटना वाढीसाठी तसेच विविध विषयांवर चर्चा करून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले त्यानंतर शिवस्मारक सभागृह शिंदे चौक सोलापूर या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रदेश महासचिव शिवाजीराजे मोरे,प्रदेश संपर्कप्रमुख नितीन शिंदे,शेतकरी आघाडी प्रदेशाध्यक्ष पंकज जराड पाटील,प्रदेश उपाध्यक्ष सुभाष गायकर,प्रदेश चिटणीस धनराज लटके,प्रदेश सहसंपर्कप्रमुख गणेश दादा माने,प्रदेश उपाध्यक्ष पांडुरंग मामा मोरे,महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष प्रगती ताई तिवारी,आयटी सेल विभाग राज्य संपर्कप्रमुख वैभव दळवी,महाराष्ट्र युवक अध्यक्ष हर्षद भोसले,पश्चिम महाराष्ट्र युवक उपाध्यक्ष पप्पू श्रीसागर,शेतकरी आघाडी
पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हनुमंत तात्या डुबल,नाशिक जिल्हा सरचिटणीस सागर शेजवळ,जालना जिल्हा प्रमुख राम पाटील गाडेकर,युवक जिल्हाप्रमुख गजानन पाटील ढवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सोलापूर जिल्हा प्रमुख निलेश शिंदे यांनी सांगितले की 12 जानेवारीपर्यंत सोलापूर जिल्ह्यामध्ये 100 शाखेचे आयोजन करण्यात येणार असून सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी आक्रमकपणे आंदोलन केले जातील.
या मेळाव्याला प्रदेश महासचिव शिवाजी राजे मोरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की छावा क्रांतिवीर सेना ही संघटना नसून आपल्या सर्वांचा पंचप्राण आहे.संघटनेचे काम करत असताना संघटनेला कुठलेही गालबोट लागणार नाही आपल्याकडून चुकीचे कुठलेही काम होणार नाही याची काळजी घ्या.आजच्या या मेळाव्याला तरुण पिढी जास्त असल्याने तरुणांचे प्रश्न संघटनेच्या माध्यमातून अग्रगण्य क्रमांकावर सोडविण्यासाठी प्रयत्न करू तुम्ही सर्वजण संघटनेची ताकद आहात अशीच एकजूट ठेवून संघटना वाढीसाठी प्रयत्न करा तुमच्या सर्वांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.
यावेळी प्रदेश चिटणीस धनराज लटके प्रदेश सह संपर्कप्रमुख गणेश माने यांनीही आपल्या भाषणांमधून सांगितले की सोलापूर जिल्ह्यामध्ये आमच्यावर जी जबाबदारी आपण टाकली आहे ती जबाबदारी सार्थ करून टाकू पश्चिम महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळात छावा नावाचं वादळ निर्माण करण्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस करून संघटन वाढू १ जानेवारी रोजी होणाऱ्या नाशिक येथील वर्धापन दिनाला पश्चिम महाराष्ट्रातून हजारो कार्यकर्ते घेऊन येण्याचे नियोजनही करण्याचा शब्द यावेळी त्यांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना दिला.
संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी आपल्य अध्यक्षीय भाषण करताना सांगितले की सोलापूर जिल्हा हा छावा मय करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी आजपासून कामाला लागा संघटनेचा दहावा वर्धापन दिन नाशिक येथे साजरा होत आहे या वर्धापन दिनासाठी आपण मोठ्या संख्येने कार्यकर्ते घेऊन यायचे आहेत त्या दृष्टिकोनातून सोलापूर जिल्ह्यात काटेकोरपणे नियोजन करा.सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार,सहकार,आरोग्य,शिक्षण, महिला यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून आपण सर्वांनी काम करा आजच्या या मेळाव्याला तरुण वर्ग सर्वात जास्त असल्याने सोलापूर जिल्ह्यात अनेक राजकीय नेते आपले राजकीय बसस्थान मांडून बसले आहे परंतु तरुणांच्या रोजगाराकडे कोणीही लक्ष देत नाही.त्यांना फक्त त्यांची आमदारकी खासदारकी घराणे शाही महत्त्वाची वाटते मंत्रिपद मिळविण्यासाठी हे सर्व राजकीय मंडळी प्रयत्न करते परंतु सोलापूर जिल्ह्यात एमआयडीसीमध्ये चांगले उद्योगधंदे आणण्यासाठी कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही शेतकऱ्यांसाठी अद्यावत अशा बाजारपेठ उभ्या केल्या जात नाही.सोलापूर जिल्ह्यामध्ये बेरोजगारीने अनेक तरुण हे चुकीच्या मार्गाला जात असताना राजकीय पक्ष फक्त त्यांचा राजकारणासाठी वापर करत आहे. यापुढे छावा क्रांतिवीर सेनेच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचे आहे आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही गोष्टींमध्ये सोलापूर जिल्हा खूप मागासलेला आहे. कुठलाही आजार बरा करायचा असेल तर त्या रुग्णाला पुणे किंवा मुंबई सारख्या ठिकाणी घेऊन जावा लागते हेच सोलापूरच दुर्दैव म्हणावा लागेल की इथे मुख्यमंत्री सारखं पद या जिल्ह्याला मिळाले मोठमोठे मंत्रिपद मिळूनही इथल्या राजकीय तर यांना या जिल्ह्यासाठी काही करता आलं नाही त्यांच्या विरोधातही मोठा लढा संघटनेच्या वतीने येणाऱ्या काळात आपण सर्व मिळून उभा करू.आज ज्या पदाधिकाऱ्यांना नवनियुक्त दिले आहे त्या सर्वांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हाप्रमुख निलेश शिंदे,युवक जिल्हाप्रमुख ओंकार यादव,विद्यार्थी आघाडी जिल्हाप्रमुख महेश जाधव आदींनी परिश्रम घेतले यावेळी उपस्थित प्रमुख पदाधिकारी तालुकाध्यक्ष सागर करमाड,तालुका कार्याध्यक्ष मंगेश श्रीसागर,ह भ प संतोष महाराज पवार,ह भ प सखाराम महाराज मोहिते.
उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार युवक जिल्हाप्रमुख ओंकार यादव यांनी मानले.