मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
दिवाळीचा आनंद सर्वांनाच घ्यायचा असतो.तेजोमय दिवाळी नक्की कशी असते. तिमिराकडून प्रकाशाकडे जाण्यासाठी प्रतिकात्मक म्हणून आपण दिवाळीमध्ये दीप उजळतो. मात्र ज्यांच्यासाठी ही प्रकाशाची वाट कायमच बंद झालेली आहे त्यांच्यासाठी प्रकाशाचा किरण घेऊन पोहोचणे गरजेचे आहे.ज्यांना स्वतःला सांभाळता येत नाही, ज्यांना राहायला घरही नाही, ज्यांचा आप्त आणि जवळच्या लोकांनी त्याग केला आहे त्यांच्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून आपणच त्यांच्यामागे उभे राहायला हवे. याच जाणिवेतून स्वामीनिवास वृद्धाश्रम पौड येथे आम्ही भेट दिली.
याप्रसंगी संस्थेत असणाऱ्या वृद्धांना दिवाळी फराळ तसेच अन्य गरजेच्या वस्तू आपापल्या परीने देण्याचा प्रयत्न केला.आपल्याकडे आहे त्यापेक्षा जास्तच आपल्याला हवे असते मात्र जे जास्त आहे ते दुसऱ्याला देण्याच्या प्रामाणिक हेतूने एडवोकेट अनिशा फणसळकर यांनी नित्यपयोगी भांडी व सामान तसेच लाडू चिवडा सर्व आजी आजोबांसाठी दिला. एडवोकेट प्रज्ञा वैद्य यांनी सर्व ज्येष्ठांसाठी खाऊ आणि पैसे स्वरूपात मदत केली. कल्पना फडतरे यांनी वृद्धांसाठी साड्या पाठवल्या. तसेच प्रीती शिंगवी आणि अनिता पाटील यांनी देखील वृद्धांस मदत केली.वृद्ध निराधार यांचे चेहऱ्यावरील सात्विक आनंद पाहून सर्वांनाच खूप समाधान लाभले.
अशा प्रकारची सामाजिक बांधिलकी मानून समाजाप्रती उतराई होण्याचे कार्य आपापल्या परीने प्रत्येकाने करावे हीच अपेक्षा असते.