करकंब प्रतिनिधी
आज चैताली गौतम शिंदे करकंब गावच्या लेकीचं कृषी उपसंचालक पदी मिळवलेल हे दैदिप्यमान यश करकंब गावच्या शिरपेचात मानाचा तुरा असलेलं आहे.आणि त्या निमित्ताने आज एकलव्य अभ्यासिका, करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीम व जागर स्वच्छता अभियान टीमच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता.
यावेळी सुरुवातीला हे यश कसं मिळवलं हे असताना चैतालीने एम.एस.करीत असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची प्रेरणा घेऊन आणि लहान पणापासून चौथी,सातवी,स्कालरशिप प्राप्त करून भविष्यात आपणही अधिकारी बनाव ही भावना निर्माण होत अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले खरोखरच अभिमानास्पद गोष्ट असून गौतम शिंदे (वडील) मनोगतात सांगितले की मी सेवानिवृत्त एस.टी.वाहक शेतात तूर काढत असताना चैतालीचा फोन आला की मी क्लासवन अधिकारी झाले.
यावेळी बोलत असताना आलेले डोळ्यातील अश्रू बरंच काही सांगून जाते,सुख म्हणजे आणखी काय असते ही भावना व्यक्त करीत करकंब गावच्या विकासासाठी भविष्यकाळात निश्चित हातभार लावेल सांगितले . ज्ञानेश्वर दुधाणे यांनी खरोखरच गरीब कुटुंबातील विद्यार्थीनी असं मोठ यश मिळवल्यानंतर अभिमानाने मन आनंदून जाते, भविष्यकाळात अनेक मोठ्या पदावर नक्की जावून आपल्या करकंब गावचे नाव उज्ज्वल करणार यासाठी शुभेच्छा दिल्या.सर्व एकलव्य अभ्यासिका मधील विद्यार्थ्यांना ही दोघांनी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एकलव्य अभ्यासिकेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर दुधाणे यांनी केले.
यावेळी पांडुरंग काटवटे,संतोष भोसले,जागर टीमच्या अंजली टकले,रमेश खारे वृषाली बोधे, अमृता रसाळ, देवकी दुधाणे, देविदास काटवटे,चेतन पुरवत, धोंडीराम भाजीभाकरे, शिक्षिका सुवर्णा टकले आणि एकलव्य अभ्यासिकेचे सर्वं विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.