पंढरपूर प्रतिनिधी
आमच्या संस्थेच्या सचिवा सुनेत्राताई पवार यांच्या संकल्पनेतून श्री माताजी निर्मला देवी प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांनी परिसरातील दगड, गोटे,माती,गोणपाट (पोती)यांच्या साह्याने सुंदर असे सिंहगड,शिवनेरी,प्रतापगड,राजगड व पन्हाळा किल्ले बनवले.
या स्पर्धेचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या शिक्षणतज्ञ सुप्रियाताई पवार , मुख्याध्यापक संतोष कवडे यांनी केले.
इयत्ता पहिलीच्या वर्ग शिक्षिका यादव व मुलांनी सिंहगड किल्ला बनवला व अनन्या शिंदे,अथर्व घाडगे, रिद्धी महामुनी यांनी माहिती सांगितली. इयत्ता दुसरीचे वर्गशिक्षिका कदम व मुलांनी शिवनेरी किल्ला बनवला. यामध्ये कु. सई रणदिवे हिने किल्ल्याची माहिती दिली व पोवाडा सादर केला. इयत्ता तिसरीचे वर्गशिक्षक साळुंखे सर्व मुलांनी मिळून प्रतापगड किल्ला बनवला आणि साकेब बागवान यांनी किल्याबद्दल माहिती सांगितली .
इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी राजगड व पन्हाळा हा किल्ला बनवला. राजगड बद्दल कु. संचिता घाडगे, आरोही खंकाळ व पन्हाळा किल्ल्याबद्दल चि. अर्णव शिंदे, श्लोक पतंगेने माहिती दिली. आयन मुलाणी याने पोवाडा सादर करून मंगेश मुळे यांनी घोषणा दिल्या.
अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांना ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मिळते. त्याचबरोबर त्यांच्या सृजनशिलतेस वाव मिळतो.' असे प्रतिपादन मा. सौ.सुप्रियाताई यांनी केले.
या स्पर्धा पार पाडण्यासाठी यादव , कदम, साळुंखे सर, महेश भोसले यांनी परिश्रम घेतले .