भाजपा पदवीधर प्रकोष्ठचे सोलापूर ( ग्रामीण ) जिल्हा संयोजक प्रा.डॉ. नागन्नाथ घोरपडे यांच्यातर्फे आयोजन
शिरभावी प्रतिनिधी
सांगोला तालुक्यातील शिरभावी येथील तथा श्री रायगड ऐतिहासिक विश्वविद्यालयाचे इतिहास विषयाचे सहाय्यक प्राध्यापक तसेच भाजपा पदवीधर प्रकोष्ठचे सोलापूर ( ग्रामीण ) जिल्हा संयोजक प्रा.डॉ. नागन्नाथ घोरपडे यांच्यातर्फे आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन तथा भाजपा पदवीधर प्रकोष्ठ महाराष्ट्र राज्याचे प्रदेश संयोजक धनराजजी विसपुते ( सर ) यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक 22 / 11 / 2023 रोजी सांगोला तालुक्यातील सांगोला येथील लोकसेवा बहुउद्देशीय संस्था कडलास ( सावंतवाडी ) संचलित मातोश्री वृद्धाश्रम सांगोला येथे फळे वाटप करण्यात आली.
प्रदेश संयोजक विसपुते ( सर ) मनमिळावू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. विसपुते नेहमीच गोरगरीब, निराधार, दिव्यांग तसेच जनतेच्या खाजगी, शासकीय, निमशासकीय यांच्या कोणत्याही कामाकरिता सदैव धावून जातात. या माध्यमातून त्यांनी आपली आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच त्यांनी आदर्श शैक्षणिक समूहाच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रकाश पाडण्याचे कार्य निरंतर केले आहे व पुढे ही करत आहेत. तसेच ते पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी भाजप पदवीधर प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक म्हणून ही कार्यरत आहेत.
वाढदिवस म्हटलं की केक, पार्टी, धिंगाणा, फिरायला जाणे असे आजच्या तरुणांईंचे समीकरणच बनलेले असते. मात्र या साऱ्या अनावश्यक गोष्टींना फाटा देत सांगोला तालुक्यातील शिरभावी येथील भाजपा पदवीधर प्रकोष्ठचे सोलापूर ( ग्रामीण ) जिल्हा संयोजक प्रा.डॉ. नागन्नाथ घोरपडे यांनी धनराजजी विसपुते ( सर ) यांच्या वाढदिवसानिमित्त या निमित्ताने गोरगरीब, गरजूंना मदत करण्याचे ठरवले व त्यानुसार त्यांनी लोकसेवा बहुउद्देशीय संस्था कडलास ( सावंतवाडी ) संचलित मातोश्री वृद्धाश्रम सांगोला येथे फळे वाटप केले. हा उपक्रम त्यांनी सांगोला येथे राबविला.
यावेळी जिल्हा संयोजक प्रा.डॉ. नागन्नाथ घोरपडे म्हणाले की, जीवनात अनेक लोकांना एक वेळचा आनंद देखील भेटत नाही. राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती आहे. त्यामुळेच माझे तरुणाईला आवाहन आहे की, आपणच उद्याचे भविष्य आहात. सामाजिक भान जपणे हे आपल्या हातात आहे. आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून अनाथाश्रम, वृद्धाश्रम, रुग्णालय, दुष्काळग्रस्त, शेतकरी, शाळा, अंध, दिव्यांग अशा गरजूंना मदत करा. जेणेकरून सामाजिक भान जपण्याचे महान कार्य आपल्या हातून घडेल असे प्रतिपादन त्यांनी केले.