पुणे प्रतिनिधी
राज्यातील गावे, शहर स्वच्छ, सुंदर सोबतच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. हाच कचरा घर, कार्यालय, मंदिर, हॉस्पिटल, शाळा, महाविद्यालय, इत्यादी ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आसरा सोशल फॉउंडेशन मार्फत काम चालू आहे.
“मिशन शून्य कचरा” मॉड्यूल कॉपीराईट घेऊन आसरा सोशल फाउंडेशन पुणे, यांचे कडून मिशन शून्य कचरा विषयावर यशदा मार्फत सरपंच/ग्रामसेवक, सदस्य, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला बचत गट सदस्य, विविध राज्यातील राजकीय सदस्य यांना प्रशिक्षण देण्यासाठी (मास्टर ट्रेनर) म्हणून काम करत आहे.
सोबतच महाराष्ट्रात प्रथमच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेत शून्य कचरा शाळा प्रकल्प पूर्ण करत आहे. आणि महाराष्ट्रात प्रथमच सावित्रीबाई यांच जन्मगाव “नायगाव” शून्य कचरा करण्यासाठी काम चालू आहे. दरम्यान महाराष्ट्र शून्य कचरा होण्यासाठी खालील प्रमाणे व्यवस्था व्हावी जेणेकरून पुढची पिढी शून्य कचरा संस्कारीत होतील. हेच उद्देश लक्षात ठेऊन अर्चना मोरे ह्यांनी मा. लोकसभा सदस्या सुप्रिया ताई सुळे यांची भेट घेतली. ताईंनी शून्य कचरा विषय महत्वाचा आहे आणि सवित्रीबाई यांचे जन्मगाव नायगाव शून्य कचरा करण्यासाठी लागणारा निधी चे नियोजन करण्यासाठी पाठिंबा दिल्या. सोबतच खालील व्यवस्था करण्यासाठी निवेदन देण्यात आले. यात अर्थसंकल्प तरतूद. सर्व शासकीय स्थळ ( शाळा/महाविद्यालय/दवाखाने, कार्यालय इत्यादी शून्य कचरा व्हावे यासाठी आदेश. सर्व स्तरावर शून्य कचरा पुरस्काराची घोषणा, गाव शून्य कचरा करण्यासाठी अर्थसंकल्प आणि आराखड्यामध्ये तरतूद, घनकचरा व्यवस्थापन या ऐवजी शून्य कचरा व्यवस्थापन असे विभागाचे नाव व्हावे, सर्व विभागाच्या अधिकारी/कर्मचारी यांना शून्य कचरा प्रशिक्षण, (यशदा मार्फत) शून्य कचरा जनजागृती मोहिम (विविध कार्यक्रम/स्पर्धा)
बचत गट संदर्भात उमेद प्रकल्पामध्ये कचऱ्या पासून व्यवसाय संदर्भात प्रकल्प, लघु उद्योग मार्गदर्शन,सब सीडी, कचऱ्यापासून तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन, स्टेट बोर्ड पासून सर्व शिक्षण पद्धतीमध्ये शून्य कचरा विषयावर अभ्यासक्रमाचा सहभाग, महाराष्ट्र शून्य कचरा दिवस, शून्य कचरा सप्ताहबाबत शासन निर्णय सावित्रीबाईंचं गाव “नायगाव” शून्य कचरा झाल्यावर तो दिवस शून्य कचरा दिवस म्हणून घोषित व्हावा.
महाराष्ट्र मध्ये शून्य कचरा सर्टिफिकेट/डिप्लोमा कोर्स,
स्टार्टअप मध्ये शून्य कचरा हा विषय, गाव/शहर स्तरावर शून्य कचरा पुरस्कार मानांकन,
शून्य कचरा गाव झाल्यावर पुरस्कार निधी (५० लाख ते १ कोटी निधीची तरतूद)
राष्ट्रीय सेवा योजना (NSS) मार्फत व्हिलेज कॅम्प मध्ये शून्य कचरा विषय,
येणार वर्ष शून्य कचरा वर्ष असावे,
शून्य कचरा आयोग/समिती
सर्व शासकीय/खाजगी यंत्रणा मध्ये शून्य कचरा समिती,
केंद्र आणि सर्व राज्यात शून्य कचरा विभाग व्हावं,
“शून्य कचरा अभियान”
कचऱ्याच्या गाडीची रचना बदल,
मा. आमदार/खासदार महोदय यांनी शून्य कचरा गाव करण्यासाठी दत्तक योजना,
राजकीय/प्रशासकिय व्यवस्थेत शून्य कचरा विभागात इतर विभागाप्रमाणे मंत्री/सचिव नेमणूक करण्यासाठी चर्चा झाली.
शून्य कचरा विषय महत्वाचा आहे. सावित्रीबाई फुले यांनी आम्हा महिलांना शिक्षणाचा अधिकार देऊन पुढाकार घेतला. त्यांच जन्मगाव शून्य कचरा करून आम्ही महिला पुढाकार घेऊन जगाच्या पातळीवर उच्च स्थानी ठेवून आदरांजली देऊ हाच उद्देश आहे.
खा.सुप्रिया ताई सुळे