धाराशिव / उमरगा प्रतिनिधी
येणेगूर ता. उमरगा जि. धाराशिव येथे भारत राष्ट्र समिती पक्षात आम आदमि पार्टी च्या नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनसह बळीराजा शेतकरी मराठवाडा संघटणेच्या पदाधिकार्यांनी भारत राष्ट्र समिती पक्षाचे धाराशिव जिल्हा सहसमन्वयक ॲड. विश्वजीत शिंदे यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केला. सदर पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाचे आयोजन उमरगा विधानसभा समन्वयक मुजीब मकानदार यांनी केले होते. यावेळी पक्षाचे नेते प्रा. मारुती कारकर व अझहर शेख हे उपस्थित होते.
जिल्हा समन्वयक ॲड. विश्वजीत शिंदे यांच्या हस्ते आम आदमी पार्टी चे प्रमुख नेते व माजी जिल्हा उपाध्यक्ष उमाकांत विश्वनाथ मंगरुळे यांच्या सह नागसेन बनसोडे, ज्ञानेश्वर सुरवसे, विश्वनाथ घोडके, आयुब चाऊस, अशोक पवार, गुलाब पवार, दुधाराम राठोड, हसन चौधरी, प्रशांत पवार, शरद राठोड, संतोष पवार, असिक मुल्ला, चांद दाऊसय, सलिम पटेल, मलंग येळीकर, अलताफ तांबोळी, गणेश मगर इत्यांदि पदाधिकार्या सोबत शेकडो कार्यकर्तांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला आहे.
सदर पक्ष प्रवेश कार्यक्रम भारत राष्ट्र समितीचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी वामशिधर राव यांच्या आदेशाने व मराठवाडा विभाग समन्वयक ह.भ.प. सोमनाथ थोरात यांच्या सुचनेने आयोजीत करण्यात आला होता.
भारत राष्ट्र समिती पक्षाचे शेतकरी हिताचे धोरण, दलितांसाठी चे कार्य व विविध जन हितांच्या योजना आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेत्रत्वावर विश्वास ठेऊन भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केल्याचे प्रवेश कर्त्यांनी सांगितले.
या वेळी अतिथींचा सत्कार मुजीब मकानदार यांनी केले तर सुत्र संचलन अझहर शेख यांनी केले, यावेळी मारुती कारकर यांनी प्रवेश करत्यांना मार्गदर्शन केले. ॲड. विश्वजीत शिंदे यांनी पक्षाचे जनहिताचे धोरण, जनतेच्या प्रति प्रामाणीकता आणि धाराशिव जिल्ह्याच्या विकासाठी कार्य करणे, पक्षात प्रामाणिक कार्य करणार्यास योग्य तो न्याय दिला जाईल असे मनोगत व्यक्त केले.