वर्धा प्रतिनिधी द्वारकाताई इमडवार
धामणगाव ( वाठोडा) गावच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत काँग्रेस समर्थित परिवर्तन पॅनलच्या उमेदवार रेश्मा प्रफुल्ल कुचेवार { आकुलवार) यांनी भरघोस मतांनी विजय प्राप्त केला आहे. ५ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या या निवडणुकीची मतमोजणी आज सोमवार ६ नोव्हेंबर रोजी पार पडली.
७३९ मतांपैकी तब्बल ४७१ मते घेऊन रेश्मा कुचेवार ह्यानी ही बाजी मारली आहे. त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी ( काँग्रेस) समर्थित ग्रामविकास पॅनलच्या मनीषा भैय्या बहरंमवार यांना १४९ तर अपक्ष उमेदवार द्वारकाताई इमडवार यांना १२२ मतांवर समाधान मानावे लागले.
वर्धा पंचायत समितीचे माजी सदस्य तथा वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक प्रफुल्ल कुचेवार यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलने धामणगाव ( वाठोडा ) ग्रामपंचायती च्या या निवडणुकीत एक हाती विजय मिळवत सरपंच पदासह ग्रामपंचायत सदस्यांच्या सातही जागेवर विजय मिळवला आहे. रेश्मा प्रफुल्ल कुचेवार यांचे विशेष हार्दिक अभिनंदन..!!अशोक आकुलवार यांनी ही अभिनंदन केले.