एटापल्ली प्रतिनिधी
होऊ द्या चर्चा अभियानातून शासन योजनेच्या एटापल्ली तालुक्यातील अति दुर्गम भागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शासन योजनेच्या भांडाफोड करण्यात आला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने दिनांक एक ऑक्टोबर 2023 ला एतापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम भागात कृष्णार येथे मरपल्ली वासामुंडी जवेली बारसे वाडा जीवनगट्टा या भागातील प्रमुख लोकांच्या उपस्थितीत होऊ द्या चर्चा बोलघेवड्या योजनाच्या भांडाफोड कार्यक्रम घेण्यात आले यावेळी अहेरी विधानसभा क्षेत्राचे शिवाजीराव खोडदे पाटील यांनी शासनाने कागदावर राबवित असलेल्या योजना लोकांची दिशाभूल करून या योजनाच्या कोणत्याही प्रकारच्या लाभ जनतेला होत नाही. शासनाच्या योजनेपासून ग्रामीण भागातील जनता वंचित आहे जनधन योजना, पिक विमा उज्वला योजना मेक इन इंडिया बेटी बचाव बेटी पढाव, प्रधानमंत्री मुद्रा लोन, प्रधानमंत्री आवास योजना, असे अनेक योजना फक्त कागदावर राबवून सतत लोकांची फसवणूक करीत आहे सध्या राज्यात महाराष्ट्र जनतेला वाऱ्यावर सोडलेले आहे गडचिरोली जिल्ह्यातील खासदार आमदार लोकप्रतिनिधी यांनी या विभागात ज्याप्रमाणे विकास करायला पाहिजे होते त्याप्रमाणे या विभागाच्या विकास शून्य आहे चांगले शिक्षण नाही रस्ते नाही पिण्याचे पाण्याची सोय नाही बेरोजगारांना युवकांच्या हातात काम नाही असे अनेक ज्वलंत प्रश्न असताना राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळ खुर्ची बचाव सत्तेचा माज या सरकारला नक्कीच जनता यांना धडा शिकवणार असे अहेरी विधानसभा क्षेत्रातील विधानसभा संपर्कप्रमुख शिवाजीराव खोडदे पाटील यांनी आपल्या भाषणात आक्रमक भूमिका घेत जनसमुदायाला मार्गदर्शन केले.
तसेच अहेरी विधानसभा .जिल्हाप्रमुख रियाज शेख यांनी जनतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध जन आंदोलन उभारणे अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत अहेरी विधानसभा क्षेत्रात निष्क्रिय लोकप्रतिनिधीं च्या विरोधात आंदोलन उभारून धडा शिकवणे गरजेचे आहे अहिरे विधानसभा क्षेत्रात रस्त्यात गड्डा गड्ड्यात रस्ता अशी गंभीर परिस्थिती या विभागात असल्याने जनतेचे हाल बेहाल झालेले आहे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने होऊ द्या चर्चा या उपक्रम राबवित प्रत्येक खेड्यापाड्यात जाऊन शासनाचे पोलखोल कार्यक्रम घेण्यात येत असल्याचे आपल्या मार्गदर्शनात जिल्हाप्रमुख रियाज शेख यांनी शासनावर व लोकप्रतिनिधी यांच्यावर गंभीर आरोप केले.
होऊ द्या चर्चा या कार्यक्रमात तालुकाप्रमुख मनीष दुर्गे यांनी अति दुर्गम भागात कोणतेही पोहोचत नाही अधिकारी वर्गांचे दुर्लक्षामुळे ज्याप्रमाणे लोकांना योजनेच्या फायदा मिळायला पाहिजे त्याप्रमाणे मिळत नाही आज संविधान वाचविणे अत्यंत गरजेचे आहे राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्यात गलिच्छ राजकारण सुरू झालेला आहे कुणाचे वडील चोरून राहिले तर कुणाचे पक्ष आणि चिन्ह चोरून राहिले. पण जनता यांना धडा शिकविणार असे मत मनीष दुर्गे व्यक्त केले.
यावेळी घटनाबाह्य विरोधात निषेधार्थ घोषणा देऊन आपला रोष व्यक्त केला. या कार्यक्रमात नामदेव हिचामी नगर सेवक, संचालन आणि प्रास्ताविक मार्गदर्शन अक्षय पुगाटी यांनी केलेदलूभाऊ पुसाली शिवसेना उपतालुकाप्रमुख, नामदेव हिचामी नगरसेवक न.पं. एटापल्ली, आयान पठाण युवासेना शहर प्रमुख, सुजल वाघमारे युवासेना उप तालुका प्रमुख, किशोर कांदो विभाग प्रमुख, नाजिद देवतळे शाखा प्रमुख, लोकेश मडावी उप विभाग प्रमुख, सचिन गेडाम विभाग प्रमुख जारावंडी, तेजस गुजल्लवार शाखा प्रमुख एटापल्ली बंडू विचामी अनेक शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते