पंढरपूर प्रतिनिधी
संभाजी ब्रिगेड पंढरपुर तालुका यांचेवतीने मा.मुख्यमंत्राी एकनाथ शिंदे यांना प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या मार्फत निवेदन देण्यांत आले.
सरकारी नोकरी भरती ही कत्राटी पद्धतीने अरण्यांचा निर्णय उद्योग,ऊर्जा आणि खानकाम विभागाने दि.०६ सप्टेबर २०२३ रोजी शासन निर्णय क्रमांक :संनकणम-२०१७ प्र.क्र.९३/कामगार -०८ आपन घेतला आणि त्याची अंमल बजावनी राज्यातील वेगवेगळ्या जिल्हाअधिकारी कार्यालयाअंतर्गत सुरु झाली आहे.तरूण मुलांना शासकीय नोकरीत कायमस्वरुपी नोकरी मिळाली पाहिजे आसा शासनाचा उद्देश आसताना राज्यांत तीन लाख पदे वेगवेगळ्या विभागात रिक्त आसताना कत्राटी पद्धतीने तहसिलदार व इतर पदे भरणे हे तरुण मुला मुलीच्या भविष्याशी व आयुष्याशी खेळण्यांचा प्रकार आहे.
सरकारी नोकर भरती ,कंत्राटी शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्र कंत्राटी पंधतीने चालवायला देणे इ.लोकविघातक शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावेत अन्यथा संभाजी ब्रिगेड सरकारमधील लोंकाना फिरू देणार नाही या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रांताधिरी गजानन गुरव यांचे मार्फत देण्यांत आले.
यावेळी संभाजी ब्रिगेड चे पंढरपुर तालुका प्रमुख दता ताड,उपाध्यक्ष प्रकाश गाजरे,विधानसभा अध्यक्ष अमोल कुंभार,गट प्रमुख धनसिंह यादव,बाळासाहेब आसबे शाखा प्रमुख सिद्धेश्वर यादव,पांडुरंग यादव उपस्थित होत.