मारापूर प्रतिनिधि
टेंभू म्हैसाळ योजनेचे पाणी हे मान नदीच्या पात्रात दाखल झाल्यामुळे पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील मान नदीकाठी असलेल्या तब्बल बावीस गावातील शेतकऱ्यांनी आज तुफान जल्लोष केला. या नदीकाठच्या शेतकऱ्यांची गेल्या 26 वर्षापासून ची प्रतीक्षा संपवून आता अशक्य वाटणारे पाणी आज कोणताही गाजावाजा न करता दाखल झाल्यामुळे अडचणीत सापडल्या शेतकऱ्याचा आनंद आज गगनात मावेनासा झाला तरी या निर्णयाचे आभार गावा गावातील शेतकरी मानताना दिसून येत आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या गाव भेट दौऱ्यामध्ये मारापुरचे सरपंच विनायक यादव यांनी मारापुर ग्रामस्थांच्या वतीने आमदारांकडे टेंभू म्हैशाळ योजनेचे पाणी मिळवण्याची मागणी केली होती. सदर मागणी व दुष्काळी परिस्थितीमुळे उजनी धरणातून पाणी सोडणे शक्य नसल्यामुळे आमदार समाधान दादा आवताडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस साहेब यांच्यामार्फत पाणी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले व टेंभू उपसा सिंचन योजनेतून पाणी उपलब्ध करून दिले.
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा असे संबोधत आज समाधान दादा म्हणजे साक्षात पांडुरंग म्हणूनच आले आहेत अशा पद्धतीने प्रतिक्रिया शेतकरी बंधूंनी देत समाधान व्यक्त केले.
सदर पाणी पूजन कार्यक्रमासाठी मारापूरचे सरपंच विनायक यादव, तावशीचे सरपंच पप्पू यादव, माझी पंचायत समिती सदस्य संजय पवार, माजी सरपंच पांडुरंग आसबे, उपसरपंच अशोक आसबे, मारापुर सोसायटीचे चेअरमन राजकुमार यादव तावशीचे चेअरमन अनिल वगैरे, अनिल यादव, आप्पा मोरे,बाळासाहेब यादव, आशोक यादव,बाळू यादव,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भगवान आसबे, पिंटू मांडवे,संतोष गांडुळे व तावशी मारापुर मधील सर्व ग्रामपंचायत सदस्य,सोसायटीचे सदस्य व मारापूर तावशी व इतर बावीस गावातील ग्रामस्थांनी आमदारांचे आभार मानले.