पंढरपूर प्रतिनिधी
सोनके - तिसंगी तलावात पाणी सोडून पुर्ण क्षमतेने भरून द्यावा या मागणीसाठी आज वाखरी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
पंढरपूर तालुक्यात पाऊस न पडल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेती सह पिण्याच्या पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्यात पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. तरी लोकप्रतिनिधी यांनी यांचा विचार करून सोनके तिसंगी तलावात पाणी पुरवठा सुरू करावा.
आमदार शहाजी बापू ने सांगोला तालुक्यात शेवाळ लागेपर्यंत पाणी दिले, आमदार समाधान दादा तुम्ही शेतकऱ्याचा दंड तर ओला होईल एवढं पाणी पंढरपूर तालुक्यात आना.
- सचिन पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटना
सोनके तलावात पाणी सोडा म्हनून आंदोलन केले त्यावेळी आंदोलकांना पाणी सोडतो म्हनून आश्वासने दिली पत्र दिली पण अधिकाऱ्यांनी लबाडी केली त्या लबाड अधिकाऱ्यांना शेतकरी कोल्हापूरी पायतान दाखवतील...
आमदार शहाजी बापू पाटील यांची पंढरपूर तालुक्यातील गावांना सावतीच्या लेकरासारखी वागणूक देत आहेत,त्यांचा झाडी डोंगर चा तंबु आता पंढरपूर तालुक्यातील शेतकरी उसकाटून टाकेल त्या वेळी त्यांना आपल्या तालुक्याचा हिस्का कळेल.
पूर्ण पावसाळा संपत आला तर सोनके तलाव भरून दिला जात नाही पाऊसाने ओढ दिल्यामुळे पिके करपू लागली आहेत निरा भाटघर धरणावर मुबलक प्रमाणात पाऊस पडल्यामुळे सोनके तलाव नियमाने पुर्ण क्षमतेने भरून मिळणे आवश्यक असताना जाणीपूर्वक पाणी सोडले जात नाही त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील शेतकरी संताप व्यक्त करत आहेत
जर सोनके तलाव भरून दिला नाही तर पुढील आंदोलन हे या पेक्षा जास्त आक्रमक असेल आमच्या शेतीचे वाळवंट होणार असेल तर रक्ताचे पाट वाहतील याचे भान ठेवा
- समाधान फाटे शेतकरी नेते