अहमदनगर प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील : आडगाव येथील बाळासाहेब कोळसे यांनी विविध मागण्यांसाठी दि. १२ ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
राज्यातील ३६ जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्र व दिल्लीपर्यंत साडेआठ हजार किलोमीटरचा प्रवास सायकल वरून करत प्रत्येक जिल्यातील जिल्हाअधिकारी, राजकीय नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री, राज्यपाल, प्रधानमंत्री, राष्ट्रपती यांना निवेदन देवून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचे काम कोळसे यांनी केले आहे; परंतु आद्यप कोळसे यांच्या मागणीची शासन दरबारी कोणी दखल घेतलेली नाही, त्यामुळे या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी कोळसे यांनी जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. 1)शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना मोफत पाणी व दहा तास वीज द्यावी, 2)नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करणे व सरकारी शाळांचे खासगीकरण करणे हे निर्णय रद्द करावेत.
राज्यातील १४ हजार शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा, 3)विविध विभागांतील स्पर्धा परीक्षा भरती प्रक्रियेसाठी वाढवण्यात आलेली 1000रुपये परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे* , आदी मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात..सरकार जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोशन मागे घेणार नसल्याबाबत कोळसे यांनी सांगितले .दिनांक 12/10/2023 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरीपुत्र बाळासाहेब कोळसे पाटील . जिल्हा परिषद शाळा सह सर्व शाळा खाजगीकरणात जात असल्यामुळे याला वाचा फोडण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त शिक्षक बंधूंनी शेतकऱ्यांनी निषेध म्हणून आपल्या गावामध्ये विद्यार्थी विद्यार्थी सह फेऱ्या काढून या आंदोलनास पाठिंबा द्यावा.त्यांच्या उपोषणास जाहिर पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहावे.ठिकाण अहमदनगर कलेक्टर ऑफिसमोर