वैजिनाथ धेडे भाजप उपजिल्हाध्यक्ष पदाचा देणार राजीनामा
सोलापूर प्रतिनिधी
20 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र सरकार कडून दिव्यांग कल्याण मंत्रालया मार्फत सोलापूर येथे मोठा गाजावाजा करून शासन दीव्यांगाच्या दारी उपक्रमा अंतर्गत मोठा दिव्यांग मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदरच्या मेळाव्यात सोलापूर जिल्ह्यातील सर्वच 11 आमदार व 2 खासदार हे विशेष अतिथी म्हणून तसेच पालकमंत्रीच अध्यक्ष असलेल्या या कार्यक्रमाचे निमंत्रित होते.
परंतु प्रत्यक्षात केवळ आमदार सुभाष देशमुख वगळता इतर सर्वच आमदारांनी , खासदारांनी व पालकमंत्रीनी शासकीय कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने दिव्यांग वैजिनाथ धेडे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी टीम मोदी सापोर्टर सेवा समिती, संघटनमंत्री भारतीय जनता पार्टी नमो नमो मोर्चा भारत, उपजिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडी, संपर्क कार्यालय .कातेवाडी ता.मोहोळ जि.सोलापुर यांनी उपजिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडीचा राजीनामा बावनकुळे प्रदेशाध्यक्ष यांच्या काडे लवकरात लवकरच मुंबई येथे भेट घेऊन देणार असल्याचे कारण 8 आमदार व 2 खासदार भाजपाचा जिल्ह्य असताना कार्यक्रमा कडे पाठ फिरवली अशी माहिती पत्रकार परिषद मध्ये बोलताना दिली.
दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे मंत्री दर्जा असणारे आमदार बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्यांग मेळावा पार पडला खरा,पण लोकप्रतिनिधी निवडणुकीत दिव्यांग मतदारांच्या दारात हेलपाटे मारतात, त्याच लोकप्रतिनिधी मेळाव्यात उपस्थित राहुन आपापल्या मतदारसंघातील दिव्यांगाच्या अडीअडचणी ऐकून घ्यावयास वेळ नसावा ,ही बाब दुर्दैवी असल्याचे धेडे म्हणाले, स्थानिक पातळीपासून (गल्ली ते दिल्ली पर्यंत ) ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हापरिषद, महानगरपालिका स्वनिधीमधुन 5 टक्के निधी खर्च करण्याची तरतूद असते.आमदार निधी वार्षिक 30 लक्ष खासदार निधी 10 लक्ष अपंगान साठी राखीव आहे अशावेळी शासन काधीही खर्चाचा अहवाल मागत नाहीत सोलापूर येथील मेळाव्यात 15 हजारांच्या आसपास दिव्यांग बांधव उपस्थित होते राज्यातील इतर मेळाव्यापेक्षा जास्त गर्दी सोलापूर येथे होती.
वास्तविक पाहता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दिव्यांग बांधवांची संख्या 5 हजार हजारांपेक्षा जास्त आहे तर सोलापूर शहरात तर दिव्यांग बांधवांनी संख्या त्यापेक्षा जास्त आहे.