पंढरपूर प्रतिनिधी
श्री. रुक्मिणी विद्यापीठ संस्थापक, सचिवा सौ सुनेत्राताई पवार यांचे मार्गदर्शनाखाली मातोश्री ईश्वराम्मा विद्यालयातील मुलींनी सामाजिक बांधिलकी या भावनेतून कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ असलेल्या भाऊबहिणीचा रक्षाबंधन कार्यक्रम रेल्वे स्टेशन पंढरपूर येथे कार्यरत असलेल्या कामगारांना विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या पर्यावरण पूरक राख्या कामगार, रेल्वे पोलीस व अधिकारी वर्गांना राखी बांधून व औक्षण करून मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात साजरा केला.
यावेळी बोलताना रमेश काळे मुख्य मालक पर्यवेक्षक मध्यरेल पंढरपूर म्हणाले की प्रत्येकाने आपले नाते छान जपण्याचा नेहमी प्रयत्न करा. बहिणीचा भावाला आशीर्वाद हा जीवनासाठी आत्मविश्वास वाढविणारा व नेहमी सोबत असणारा असतो. विद्यार्थ्यांनी नेहमी शिक्षणाच्या प्रवाहात राहवे व आपले ,देशाचे नाव उज्वल करावे व समाज हिताचे काम नेहमी करावे असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी एस.टी माने, मोहम्मद शफी शेख,एस.ए. देशमुख यांचे सह प्राचार्या नंदिनी गायकवाड. विभावरी डुबल ,सविता लोखंडे उपस्थित होत्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सृष्टी लोंढे, साक्षी लिगाडे या विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले.