मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्राचे विधिमंडळाचे सुरू असलेल्या अधिवेशनास काल उध्दव ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती.
यावेळी विधानभवनात विरोधीपक्षनेते कार्यालयात युवासेनेचे युवानेते रणजित बागल यांनी त्यांची भेट घेतली.
यावेळी "पक्षप्रमुखांनी आपल्याला मार्गदर्शन केले व भागातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणुन घेतल्या,दुधदराबाबत सरकारची घोषणा फसवी आहे असे अवगत केल्यानंतर,शिवसेनेचे आमदार विधानसभा सभागृहात नक्कीच याबाबत आवाज उठवतील असे उध्दवजींकडुन आश्वासित करण्यात आले आहे"असे बागल यांनी सांगितले.